![]() |
माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे,हा माणुसकीचा संदेश अवघ्या विश्वाला देऊन हे विश्वची माझे घर म्हणणारे ..जगद्गुरू तुकोबाराय ...
जे का रंजले गांजले !त्याशी म्हणे जो अपुले तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा..!असा हा मानवतेचा संदेश देणारे जगद्गुरू तुकोबाराय ...
जगाच्या कल्याणा संताची विभूती..देह कष्टविती परऊपकारे....असा देह,अशी संपत्ती जनतेस वाटप करणारा जगातील पहिला सावकार..पहिला जाणता बळीराजा म्हणजे जगद्गुरू तुकोबाराय ...
माझ्या विठ्ठलास भेटण्यास मंत्र,तंत्र,यज्ञ,पूजा,जप,तप,ध्यान,धारणा तसेच भोंदू बाबा,अशा कशाची व कोणत्याही मध्यस्थीची गरज नाही हे परखडपणे विठ्ठलाचे दार खुले करणारे सोबत वेदाचा अर्थ आम्हालाच ठाऊक आहे हे सांगणारे विद्रोही जगद्गुरू तुकोबाराय ...
शिव तुझे नाव ठेविले पवित्र ..छत्रपती सूत्र विश्वाचे कि..असा छत्रपती शिवरायांना गुरु संदेश देणारे जगद्गुरू तुकोबाराय ...
याच्याही पुढे जाऊन मी तर म्हणेन..
अनु रेनुया थोकडा तुका अकाशा येवढा ...
महाराष्ट्र ही साधू संतांची पराक्रमी राज्याची,विद्वानाची महा पुरुष्यांची भूमी अशा अनेक थोर मोठ्यांनी या मातीत जन्म घेऊन आपल्या कार्यकर्तृत्वातून या मातीस पवित्र बनवले ,या मातीचा ढेकूळ पाण्यात टाकल्यावर जो तवंग उमठेल तो याच महामानवांच्या विचारांचा आणि संस्काराचाच असेल ..
काय जादू केली त्यांनी या मातीवर काय उपकार आहेत त्यांचे या मातीवर या मातीतल्या माणसावर ..?
काय जादू केली त्यांनी या मातीवर काय उपकार आहेत त्यांचे या मातीवर या मातीतल्या माणसावर ..?
असे नाना प्रश्न समोर उभे राहतात.. तेव्हा पावले पुस्तकाच्या कपाटाकडे वळतात,पुस्तकांची इतिहासाची पाने पालटायला लागतात..त्यातील इतिहास काय या महा व्यक्तीचे जीवन चरित्र काय त्यांनी केलेले दैदिप्यमान कार्य काय..आपले आदर्श काय..आपण काय करतोय ..आपण काय केल पाहिजे..?
आपणही अशा अवस्थेत आहोत आपल्याला आपले महापुरुष निट समजले नाहीत किंबहुना आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न ही केला नाही..अनेक वर्षापासून आपल्यावर चुकीचा इतिहास खपवला गेला आपण झोपलो होतो सताड ...
मी प्रथमतः युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेब,मा.म.देशमुख,डॉ.आ.ह.साळुंखे,या पुरुषांना धन्यवाद देतो,कि ज्यांच्या मुळे महापुरुष आमच्यापर्यंत पोहचले..आम्ही झोपेतून जागे झालो,आत्ताशी कुठे आपला इतिहास तुम्ही आम्ही शोधू लागलो आहोत..पुरलेला इतिहास आपण उकरून काढू लागलो आहोत...आपले महापुरुष धूळ खात बसले होते,आपण ति धूळ झटकली आहे,आपल्या महापुरुषाचा इतिहास समजून घेऊ लागलो आहोत..कोण होते बळीराजा..?कोण होते तथागत..?कोण होते सम्राट अशोक..?कोण होते तुकोबाराय..कोण शहाजी..कोण जिजाऊ.सावित्री कोण..अहिल्याराणी कोण...कोण शिवराय..कोण संभाजी..कोण शाहू..कोण फुले..कोण बाबासाहेब..हे समजू लागले आहे..!
या सर्व महापुरुषांचा अभ्यास केल्यावर आपणास एक खरा इतिहास समजणार आहे ....मेरू पर्वताची लेखणी करून सागराची शाई म्हणून वापर केला आणि संपूर्ण पृथ्वी हा कागद म्हणून वापरला तरी ते पुरणार नाही ..असे महापुरुष या महाराष्ट्रात जन्मले ही अभिमानाची गोष्ट आहे ..
संत तुकोबाराय हे त्यातील एक ...
तुकोबारायांचा जन्म:-तुकोबांच्या घरातील वातावरणच मुळात आध्यात्मिक होते. पिढ्या न् पिढ्या पंढरपूरची वारी होती. विठ्ठलाची भक्ती होती. तुकोबांसारखे संत जन्माला येतात ते त्यांच्या घरच्या संस्कारांमुळे. पिढ्या न् पिढ्या जपलेल्या सद्वर्तनामुळे.
शुद्धबीजा पोटी । फळे रसाळ गोमटी ।।
मुखी अमृताची वाणी । देह वेचावा कारणी ।।
सर्वांगी निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ।।
तुका ह्मणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ।।
अशाच सुसंस्कारिक कुटुंबात तुकोबांचा जन्म बोल्होबा आणि माता कनकाई यांच्या पोटी २ फेब्रुवारी १६०८ रोजी झाला. घरची श्रीमंती असल्यामुळे बालपण मोठया कोडकौतुकात आणि खेळण्यात गेले.व्यवहारचे आणि परमार्थाचे शिक्षण तुकोबांना वडील बोल्होबा यांचेकडून मिळाले.वडील बंधू सावजी यांनी धंदा-व्यापारात लक्ष घालण्याचे नाकारल्यावर बोल्होबांनी तुकोबांना धंदा-व्यापार,सावकारकी पाहाण्यास सांगितली.बाजारपेठेतील महाजनकीचे वाडयात बोल्होबांच्या हाताखाली काम करता-करता व्यवसायाचे धडे मिळत गेले. वयाचे तेराव्या वर्षी तुकोबांच्या गळ्यात संसार पडला.तुकोबा स्वतंत्रपणे व्यवसाय पाहू लागले. सावकारकीत, व्यापारधंद्यांत तुकोबांनी चांगलाच जम बसविला. लोकांकडून शाबासकी मिळू लागली. सर्वजण प्रशंसा करू लागले. राहात्या घरातील सोज्वळ सात्त्विक वातावरण तुकोबांनी बाजारपेठेतील-घरात-व्यवसायात आणले. तिन्ही भावांची लग्नकार्ये झाली. तुकोबांची प्रथम पत्नी रखमाई दम्याने नेहमी आजारी म्हणून तुकोबांचा दुसरा विवाह पुण्यांतील सुप्रसिध्द सावकार आप्पाजी गुळवे यांची कन्या सौ. जिजाऊ उर्फ आवली यांच्याशी झाला. एका श्रीमंत घराण्याचा दुसऱ्या श्रीमंत घराण्याशी संबंध होता. हे ऐहिक ऐश्वर्य पराकोटीला पोहोचलं होतं. घरात धन-धान्य विपुल होते. प्रेमळ माता - पिता,सज्जन बंधू, आरोग्यसंपन्न शरीर होतं. कोणत्याही गोष्टीची काही उणीव नव्हती.
शुद्धबीजा पोटी । फळे रसाळ गोमटी ।।
मुखी अमृताची वाणी । देह वेचावा कारणी ।।
सर्वांगी निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ।।
तुका ह्मणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ।।
अशाच सुसंस्कारिक कुटुंबात तुकोबांचा जन्म बोल्होबा आणि माता कनकाई यांच्या पोटी २ फेब्रुवारी १६०८ रोजी झाला. घरची श्रीमंती असल्यामुळे बालपण मोठया कोडकौतुकात आणि खेळण्यात गेले.व्यवहारचे आणि परमार्थाचे शिक्षण तुकोबांना वडील बोल्होबा यांचेकडून मिळाले.वडील बंधू सावजी यांनी धंदा-व्यापारात लक्ष घालण्याचे नाकारल्यावर बोल्होबांनी तुकोबांना धंदा-व्यापार,सावकारकी पाहाण्यास सांगितली.बाजारपेठेतील महाजनकीचे वाडयात बोल्होबांच्या हाताखाली काम करता-करता व्यवसायाचे धडे मिळत गेले. वयाचे तेराव्या वर्षी तुकोबांच्या गळ्यात संसार पडला.तुकोबा स्वतंत्रपणे व्यवसाय पाहू लागले. सावकारकीत, व्यापारधंद्यांत तुकोबांनी चांगलाच जम बसविला. लोकांकडून शाबासकी मिळू लागली. सर्वजण प्रशंसा करू लागले. राहात्या घरातील सोज्वळ सात्त्विक वातावरण तुकोबांनी बाजारपेठेतील-घरात-व्यवसायात आणले. तिन्ही भावांची लग्नकार्ये झाली. तुकोबांची प्रथम पत्नी रखमाई दम्याने नेहमी आजारी म्हणून तुकोबांचा दुसरा विवाह पुण्यांतील सुप्रसिध्द सावकार आप्पाजी गुळवे यांची कन्या सौ. जिजाऊ उर्फ आवली यांच्याशी झाला. एका श्रीमंत घराण्याचा दुसऱ्या श्रीमंत घराण्याशी संबंध होता. हे ऐहिक ऐश्वर्य पराकोटीला पोहोचलं होतं. घरात धन-धान्य विपुल होते. प्रेमळ माता - पिता,सज्जन बंधू, आरोग्यसंपन्न शरीर होतं. कोणत्याही गोष्टीची काही उणीव नव्हती.
वयाच्या सतराव्या वर्षी कर्तबगार प्रेमळ पिताश्री बोल्होबा मृत्यू पावले.ज्यांनी तुकोबांना मिराशीचे धनी केले.
बाप करी जोडी लेकराचे ओढी । आपली करवंडी वाळवोनी ॥१॥
एकाएकीं केला मिराशीचा धनी । कडीये वाहुनि भार खांदी ॥२॥
मिराशी-महाजनकी आणि देवाची सेवा.ज्यांच्यामुळे संसारतापाची झळ लागत नव्हती, तेच छत्र हारपले.
बाप मेला न कळता । नव्हती संसाराची चिंता ॥१॥
(न कळता म्हणजे एकाकी माझे पश्चात) तुकोबांना असह्य दुःख झाल. हे दुःख कोठे ओसरते न ओसरते तोच पुढील वर्षी प्रेमळ माता कनकाई तुकोबांच्या देखत मृत्यु पावल्या.
माता मेली मज देखता ॥४॥
तुकोबांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. मातेने तुकोबांकरिता काय केल नाही सर्व काही केल.
काय नाही माता गौरवीत बाळा । काय नाही लळा पाळीत ती ॥१॥
काय नाही त्याची करीते सेवा । काय नाही जीवा गोमटेते ॥२॥
अमंगळपणे कांटाळा न धरी । उचलोनि करी धरी कंठी ॥३॥
यापुढे वयाच्या अठराव्या वर्षी वडील बंधू सावजींची पत्नी निधन पावली. आधीच सावजीचे प्रपंचाकडे लक्ष नव्हते, त्यात पत्नीचा मृत्यू. ते घरदार सोडून तीर्थयात्रेला जे गेले ते गेलेच. कुटुंबातील चार माणसांचा वियोग झाला. ज्या संसारात एकही उणे नव्हते त्यात आता एक एक उण होऊ लागल. तुकोबांनी धीर खचू दिला नाही.औदासीन्य आवरून विसावे वर्षी प्रपंच नेटका करण्याचीअपेक्षा धरली. पण हाय !एकविसाव्यात विपरीत काळ आला. दक्षिणेत मोठा दुष्काळ पडला. महाभयंकर दुष्काळ होता तो. इ. स. १६२९ (शके १५५०-५१) पाऊस उशिरा पडला. शेवटी अती वृष्टीने पिके गेली. लोकांना इ.स. १६३० मध्ये पाऊस अजिबात पडला नाही. सर्वत्र हाहाकार उडाला. धान्याचे भाव कडाडले. चाऱ्याच्या अभावी शेकडो गुरे मेली. अन्नावाचून शेकडो माणसे मेली. इ.स. १६३१ मध्ये त्या अती वृष्टीमुळे पिके गेली.
सहज सरले होते काही । द्रव्य थोडे बहु ते ही ।
त्याग केला नाही । दिलें द्विजां याचकां ॥३॥
काही द्रव्य सहज सरून गेल होत आणि थोडबहुत जे राहिल होत ते तुकोबांनी वाटून टाकले..
सरतीं पुरतीं धनवित्तें ।। गरीबीत होते ते पुरवून घेतले आणि श्रीमंतीत ते सरतें केले! म्हणजे ते अतिरिक्त धन आपले मानले नाही! हे फार विशेष आहे. हे फार दुर्मीळ आहे. (यावरून तुकोबांचे दिवाळ निघाल होत असा शब्दशः अर्थ घ्यावयाचा नाही.)
''जगाच्या कल्याणा संताची विभूती..''
सरतीं पुरतीं धनवित्तें ।। गरीबीत होते ते पुरवून घेतले आणि श्रीमंतीत ते सरतें केले! म्हणजे ते अतिरिक्त धन आपले मानले नाही! हे फार विशेष आहे. हे फार दुर्मीळ आहे. (यावरून तुकोबांचे दिवाळ निघाल होत असा शब्दशः अर्थ घ्यावयाचा नाही.)
''जगाच्या कल्याणा संताची विभूती..''
तुकोबांनी घर सत्याच्या शोधार्थ सोडल्यापासून तुकोबांचे धाकटे बंधू कान्होबा त्यांच्या शोधार्थ देहू गावचे परिसरातील डोंगर, दऱ्या-खोऱ्या, जंगले धुंडाळत होते. शोधता शोधता ते भामनाथ पर्वतावरील गुहेत येऊन पोहोचले आणि आश्चर्यचकित झाले सोनियाचा दिवस तो. कान्होबांच्या नेत्रांचे पारणे फिटले. जन्माचे सार्थक झाले. उभयता बंधूंची भेट झाली.त्यांतर ते देहूस आले ज्या तुकोबांनी कान्होबांकडून खते पत्रे आणून घेतली.यांचे लोकांकडे जे येणे होते त्या त्या लोकांकडून लिहून घेतलेली खते होती. त्याच्या वाटण्या केल्या. निम्मी खते कान्होबाला दिली आणि स्वतःच्या वाटयाची निम्मी खते तुकोबांनी इंद्रायणीच्या डोहात बुडविली. या धनकोने ऋणकोकडून येण असलेल्या रकमा दुष्काळानंतर येनकेन प्रकारेण वसूल करून आपल्या विस्कटलेल्या संसाराची घडी बसविण्याऐवजी खते गंगार्पण करून ऋणकोंना जगातील एका मोठ्या धनकोनी बळीराजा नंतरची दुसरी कर्जमाफी केली.. आपण सावकारकीकडे पाठ फिरवून विन्मुख झाल्याचे जगाला दाखवून दिल. याला म्हणतात सच्चा समाजवाद.
तुकोबांचा एकांत:-
तुकोबांना एकांतवास फार आवडत असे. या एकांतात त्यांना सखेसोयरे भेटले होते. अर्थात् ते एकांतांतील सख्यासोयऱ्यांपेक्षा निराळे होते. कोण होते ते ?वृक्ष होते, वेली होत्या ! वनचरे होती. पक्षीराज मधुर, मंजुळ सुरात कुजन करीत होते. देवाला आवळीत होते.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षीये सुस्वरे आळविती ॥१॥
येणे सुखे रूचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥धृ॥
आकाश मंडप पृथिवी आसन । रमे तेथे मन क्रीडा करू ॥३॥
येणे सुखे रूचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥धृ॥
तुकोबांच्या पत्नी जिजाऊ रोज घरचा कामधंदा आटोपून स्वयंपाक उरकून तुकोबांचे जेवण घेऊन भंडाऱ्या डोंगरावर जात असत. तुकोबांना जेऊ घातल्यानंतर आपण जेवत असत, तुकोबा परमार्थ साधनेत निमग्न असता - विदेह स्थितीत असता त्यांची सर्व काळजी सौ. जिजाबाई घेत असत. तुकोबांच्या परमार्थात जिजाबाईंचा फार मोठा वाटा होता. शरीर कष्टवून परोपकार, संत वचनाचे पाठ- पाठांतर, वाचणे विठ्ठलाचे नामस्मरण आणि चित्ताने विठोबाचे ध्यान - अशी साधना अखंड चालू असता तुकोबांच्या मनाने एक अशी उंची गाठली कि त्यांच्या मुखातून कवित्व बाहेर येऊ लागले..
तुकोबांचे कवित्व:-
‘तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदान्त वाहे पाणी।।’ भक्ती -ज्ञान-वैराग्य याने ओथंबलेली संत तुकारामांची अभंगवाणी परब्रह्माच्या अद्वैताची मनोमन पूजा बांधते. विठ्ठलाचे ते विटेवरचे सावळे परब्रह्म, सगुण साकार होऊन, स्वतःला तुकोबांच्या ‘अभंग-भक्तिरसात’ बुडवून घेण्यात धन्यता मानत असले पाहिजे असे वाटावे, इतके तुकारामाचे अभंग रसाळ आहेत.
‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।’ असे म्हणत, शब्दांवर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले, जातिभेदावर टीका केली, श्रीविठ्ठलावरची भक्ती प्रकट केली, अध्यात्माचे सार सांगितले.देश-काळ-लिंग भेदाच्या पलीकडे त्यांची काव्य प्रतिभा झेपावलेली आपल्याला दिसते. ‘विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ।।’ या भूमिकेचा त्यांनी १७ व्या शतकात प्रसार केला. सांप्रदायिक आभिनिवेश बाजूला ठेवून ऐक्यभाव, समता प्रस्थापित केली. भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. अभंग म्हणजे ‘अक्षर वाङ्मय’ आहे. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.
तुकोबांची भक्ती:-
हजारो देवाना भजण्यापेक्षा तुकोबाराय विठ्ठलालाच भजतात...
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥
तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥
मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥
तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥
३
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥
गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥
विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥
तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥
४
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥
कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ध्रु.॥
मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥२॥
कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयानो ॥३॥
सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥४॥
५
कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥
ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥
कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥२॥
गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तें चि रूप ॥३॥
झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥४॥
तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥५॥
आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥
कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक । तयाचा हरिख वाटे देवा ॥ध्रु.॥
गीता भागवत करिती श्रवण । आणीक चिंतन विठोबाचें ॥२॥
तुका म्हणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥३॥
ऐका महिमा आवडीचीं । बोरें खाय भिलटीचीं ॥१॥
थोर प्रेमाचा भुकेला । हा चि दुष्काळ तयाला । अष्टमा सिद्धींला । न मनी क्षीरसागराला ॥ध्रु.॥
पव्हे सुदामदेवाचे । फके मारी कोरडे च ॥२॥
न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे । तुका म्हणे भक्तीपुढें ॥३॥
कन्या सासुर्यासि जाये । मागें परतोनी पाहे ॥१॥
तैसें जालें माझ्या जिवा । केव्हां भेटसी केशवा ॥ध्रु.॥
चुकलिया माये । बाळ हुरू हुरू पाहे ॥२॥
जीवना वेगळी मासोळी । तुका म्हणे तळमळी ॥३॥
तुकोबांचा विद्रोह:-
वैदिक धर्मात वेदालाच प्रमाण मानत,त्यानुसारच समाजरचना ,न्याय निवाडा सर्व व्यवहार चाले त्याच काळात तुकोबांनी खरा धर्म काय ते सांगितले त्याच बरोबर वेदाचाही अर्थ काय तेही तुकोबाराय सांगतात..ते म्हणतात,वेदाचा खरे पाहता,वेदपाठ करणाऱ्यानाच त्याचा अर्थच कळत नाही आणि इतरांना तर वेदश्रवण-पठणाचा अधिकारच नाही. ‘वेदाचें गव्हर न कळे पाठकां। अधिकार लोकां नाही येरा’ असे ते सांगत होते. हे वैदिक म्हणजे निव्वळ हमाल. धनाने भरलेला हंडा घेऊन जाणाऱ्या मजुराला जसा आतील धनाचा लाभ नसतो, नुसत्याच पाहणाऱ्याला जशी खाण्याची गोडी अनुभवता येत नसते, तसेच त्यांचे. अशी टीका करत असतानाच तुकोबा आत्मविश्वासाने सांगत होते- वेदाचा अर्थ त्या भारवाहकांना नव्हे, तर केवळ आम्हालाच ठाऊक आहे.
‘वेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा।
येरांनी वाहावा भार माथां।
खादल्याची गोडी देखिल्यासी नाहीं।
भार धन वाही मजुरीचें।।’
मग वेदाचा खरा अर्थ काय आहे?
तुकोबा सांगतात..
‘वेद अनंत बोलिला। अर्थ इतुलाचि शोधिला।।
विठोबासी शरण जावें। निजनिष्ठा नाम गावें।।
सकळशास्त्रांचा विचार। अंतीं इतुलाचि निर्धार।।
अठरापुराणी सिद्धांत। तुका म्हणे हाचि हेत।।’
वेदांनी अनेक विषय सांगितले आहेत. पण त्यांचा मुख्य अर्थ हाच की, विठ्ठलाला शरण जाऊन निजनिष्ठेने त्याचे नाम गावे. सगळ्या शास्त्रांचा, अठरा पुराणांचा हाच सारांश आहे, सिद्धान्त आहे. याही पुढे जाऊन ते म्हणतात- विठ्ठल हा शास्त्रांचे सार आहे, वेदांची मूर्ती आहे. आणि तोच आमचा सांगाती, प्राणसखा आहे.
‘म्हणऊनि नाही आणिकांचा पांग।
सर्व झालें सांग नामें एका।।’
विठ्ठलाच्या नावातच सगळा वेदांचा अर्थ आहे, असे सांगून तुकोबा वेदप्रामाण्यावर आधारलेल्या सनातन वैदिक धर्माला धक्का देत आहेत. ‘नेणती वेद श्रुती कोणी। आम्हां भाविकांवाचूनि।।’ असे म्हणत ते ब्राह्मणांच्या अधिकारांनाही आव्हान देत आहेत. वेदांचा बोल ऐकण्याचाही अधिकार ज्या वैश्य, शूद्र, चांडाळांना नाही, त्यांच्यापुढे ते हा नवाच वेदार्थ ठेवत आहेत.
‘सकळ शास्त्रांचे सार। हें वेदांचे गव्हर।
पाहतां विचार। हाचि करिती पुराणें।।
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र। चांडाळांही अधिकार।
बाळें नारीनर। आदिकरोनि वेश्याही।। ’
पंढरीचा हा जो स्वामी आहे तोच सकळ शास्त्रांचे सार आहे. वेदांचाही मुख्यार्थ तोच आहे. सर्व वर्णीयांना, आबालवृद्धांना, स्त्री-पुरुषांना, एवढेच काय- चांडाळ आणि कसबिणींनाही त्याच्या भक्तीचा अधिकार आहे असे ठामपणे ते सांगत आहेत. ‘शूद्रवंशी जन्मलो। म्हणोनि दंभे मोकलिलो’,असेही महाराज म्हणतात,
‘बरें देवा कुणबी केलो। नाही तरी दंभे असतो मेलो’ अशी चपराक देत आहेत.
वर्णभेद, जातिभेद, त्यातून आलेली पुरोहितशाही यांना हा असा रांगडा विरोध हा तुकोबांच्या संघर्षांचा केंद्रबिंदू आहे. आता हा विरोध केवळ चंद्रभागेच्या वाळवंटापुरताच मर्यादित आहे, अध्यात्माच्या क्षेत्रापुरताच सीमित आहे; तो सामाजिक पातळीवर नाही, असे म्हणणे सोपे आहे. पण ज्या समाजात शतकानुशतके सर्वच पातळ्यांवर अत्यंत खोलवर चातुर्वण्र्य व्यवस्था रुजलेली आहे, जिच्या समर्थनार्थ सगळे धर्मग्रंथ उभे आहेत, धार्मिक कायदा जिच्या बाजूला आहे, त्या व्यवस्थेला त्या काळात अध्यात्माच्या क्षेत्रापुरता का होईना, विरोध करणे हे किती कठीण काम होते, हे पुढे खुद्द तुकोबांनाच जे सहन करावे लागले त्यावरून सहज लक्षात यावे. दुसरी बाब म्हणजे अध्यात्मातील समतेच्या पुरस्काराने विषमतेचे समर्थक जर एवढे संतापत असतील, तर त्या समतापुरस्काराचा परिणाम अध्यात्म क्षेत्रापुरताच मर्यादित होता असे तरी कसे म्हणता येईल? तरीही न डगमगता त्यांनी हे वेदाधारित पाखांड मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रयत्नांना जोड होती अभ्यासाची, नैतिकतेची, आत्मविश्वासाची. ते म्हणतात, वेदान्त वेदान्त तुम्ही आम्हाला काय सांगता? ‘तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदान्त वाहे पाणी।।’ कारण-
‘तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते।
स्वयंभू आइते केले नव्हों।।’
आम्ही साधेसुधे नाही, तर विधीचे बाप आहोत! आम्ही स्वत:सिद्ध आहोत!!
(विद्रोही तुकाराम- या डॉ. आ.ह. साळुंखे यांच्या ग्रंथामध्ये तुकोबांचा खरा विद्रोह व त्यांचे अनेक पैलू आपणास पाहायला मिळेल.
तुकोबांचा मृत्यू :-
तुकोबांच्या मृत्यू बाबत दोन मत प्रवाह आहेत,एक म्हणजे सदैव वैकुंठ तर दुसरा प्रवाह म्हणजे तुकोबांचा खून करण्यात आला.
संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या निर्वाणासंबंधी आजपर्यंत अनेकांनी चर्चा केली आहे."महाराष्ट्र सारस्वत"कार भावे यांच्या पासून ते आत्तापर्यंतचे साहित्यिक यात आहेत.श्री वा.सी.बेंद्रे यांसारखे संशोधकही यामध्ये आहेत.यांच्या मालिकेत आजच्या सामाजिक संघटनांचा देखील समावेश करावा लागेल.संत तुकारामांचा खुनच केला असावा असे स्पष्टपणे प्रतिपादन करणारेही बरेच होऊन गेले.इतकेच काय पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही "मेला की मारला कळेना । म्हणती वैकुंठाला गेला ।" या आपल्या उद्गारात याच प्रमेयाकडे संकेत केला आहे.
निर्वाण अभंग आणि अभंगपत्रे
संतश्रेष्ठ तुकोबांच्या निर्वानाचा प्रश्न त्यांच्याच अभंगाच्या द्वारे सर्वांनी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.मग त्यात मत-मतांतरे का निर्माण व्हावीत ? यातील एक महत्वाची गोष्ट अशी की, संतांच्या आज ज्या गाथा आढळतात त्यात त्यांनी हे लिहिलेले अभंग कालानुक्रमाने दिलेले असतात असे मुळीच नाही.संत तुकारामांच्या अभंगातही असेच झालेले आहे.आपल्या आयुष्यात अभंगरचना करताना कदाचित स्वत: तुकाराम महाराजांनी किंवा त्यांच्या लेखनिकांनी ते क्रमश: लिहुन ठेवलेलेही असतील.पण आज कालानुक्रमाने लिहिलेल्या अशा अभंगाचा अस्सल गाथा उपलब्ध नाही.आहे त्या अभंगाची विषयावार विभागणी करून ते छापलेले आहेत.उपलब्ध गाथ्यात सर्वत्र ही विषयविभागणी आणि त्यात अंतर्भूत केलेल्या अभंगाची संख्या ही सारखी आढळते अशी नाही.अशा विषयविभागणीच्या प्रयत्नातूनच तुकाराम महाराजांच्या अंत्यकाळाविषयीच्या अभंगाचे प्रकरण निर्माण झाले आहे.
निरनिराळ्या गाथ्यात आढळणार्या अशा निर्वाण प्रकरणातील अभंगाची तर्ककठोर बुद्धीने छाननी केली तर समजुन येईल की हे निर्वाणाचे अभंग केवळ संकलनात्मक आहेत.प्रत्येक संपादकाने वेगवेगळ्या अभंगसंचातून आपल्याला सोईचे वाटतील असे किंवा ओढून ताणून उपयोगी आणता येतील असे असंबद्ध विषयींचे अभंग आपापल्या संपादणीतील निर्वाण प्रकरणात संकलीत केले आहेत.इतकेच नाही तर तुकोबांच्या निर्वाणासंबंधी आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ काही प्रक्षिप्त अभंगही त्यात घातले गेले आहेत.या संकलनाबाबत एक दोन उदाहरणे पुरेशी आहेत.
१] "क्र.१५९६ या अभंगात गरुडावर बसून चतुर्भुज हरी वैकुंठाहुन तुकोबांच्या घरी येतात..क्र.१६०६ मध्ये श्रीरंगाशेजारी गरुडावर बसण्याऐवजी तुकोबा एकदम कुडीसहीत गुप्त होतात...गुप्त झाल्यानंतरही अभंग सुरुच असतात.क्र.१६०७ मध्ये तर आत्तापर्यंतच गरूड विमानात परिवर्तीत होतो आणी तुका बैसला विमानी हे द्रुष्य़ संत लोचनी पाहू शकतात. याच अभंगाच्या शेवटी तुका वैकुंठासी नेला तरी देखील १६०८ हा अभंग जन्मास येतोच.त्यात तर तुकोबा ’क्षीरसागर शयनी’ पोहचून सिंहासनी बसले आहेत.तो अभंग इहलोकी कसा म्हंटला गेला ? आणि क्षीरसागरी पोहचल्यानंतर वाराणसीपर्यंत असो सुखरूप (क्र.१६०९) असा काशीला पोहचल्याचा निरोप कसा काय आला ? या शेवटच्या अभंगात आपण येथून निजधामास जाणार असे तुकोबा म्हणतात..येथे तुकोबांबरोबर देव नाही पण गरूड मात्र आहे ! ..अशी ही सारी विसंगतीची चमत्क्रुती !"
२] "चार कोसांवर विमान थांबवून जर हे अभंग लिहिले तर ’सकळही माझी बोळवण करा’ हे म्हणजे भुमीवरचे की आकाशातले ? ’उठा एक ऐका सांगतो तुम्हासी’..अशी सहा ओळीत तीनदा सांगण्याची पुनुराव्रुत्ती व्हावी,हे तुकोबांना सर्वथा अमान्य असणार्या रचनाशैथिल्याची कल्पना आणुन देण्यास पुरेसे नाही का ? स्वपत्नीसाठी येतो काकुलती मनी धरा म्हणून ’पदर पसरून दाढी ओठी’ धरून केविलवाणीने लोकांची मनधरणी करावी..देवासह वैकुंठी जाण्याचे अपुर्व भाग्य लाभले असताही ’अहो देवा ! कैसी घरबुडवण केली’ म्हणून आकांत करावा आणि ’देवांचे ते मुळ शोधू नये कोणी’ असा भलताच उपदेश करावा हे सारे तुकोबांच्या व्यक्तित्वाशी सुसंगत असेच आहे का ? ..’म्हणे मज आता निरोप द्यावा- ऐसे बोलो निया गुप्त झाले’ ही सारी रचना तुकोबांचीच आहे असे म्हणता येईल का ?..."
श्री तुकोबा महाराज विमानात बसुन सदेह वैकुंठाला गेले असे मानणार्या प्राचीनांनीच त्यांची ’विमानातून लिहिलेई अभंगरुप पत्रे’ निर्माण केली आहेत.असे का म्हणू नये ? ’चौकोशावरी थांबवली विमाने । पत्र हे तेथून तुम्हा लिहिले’ व ’स्वर्गलोकीहुनि आले हे अभंग’ या वचनांमधील ’तेथून’ व ’आले’ हे शब्द स्पष्टच सुचवितात की ते शब्द प्रुथ्वीवरील व्यक्तीच उच्चारू शकते.शिवाय ’चौकशा’वर ’स्वर्गलोक’ असू शकत नाही.’सप्त अभंगी पत्र’ व ’बारा अभंगी पत्र’ या दोन्ही बरोबर ’टाळगोधडी’ चा उल्लेख आहेच.तेंव्हा,तुकोबांबरोबर ’टाळगोधड्या तरी किती कल्पाव्या ? "तुकोबांचे निर्वाण झाले द्वितीयेस तर टाळगोधडी मिळाली पंचमीस ! हे साहित्य नेमके देहुलाच पडले" हे वास्तवतेच्या पलिकडचे नव्हे काय ? अशा भाकडकथा सांगणारे अभंग प्रक्षिप्त नव्हे तर काय म्हणावे ?. शुद्ध संशोधनासाठी देवधर्म आणि अंधश्रद्धा यांमध्ये बुडालेले कोणी भक्त म्हणतील की लोकमाणसात वैकुंठगमनाची दिव्य कल्पना शेकडो वर्ष द्रुढमुल झाली असता आता हे नव्याने मांडून कोणते कल्याण होणार आहे ? "जाले तेंव्हा जाले मागील ते मागे । आता वर्म लागे ठावी झाली ॥" हे सत्य असले तरी गडे मुर्दे उकरून लाभ काय ? हा प्रश्न बराच महत्वाचा आहे..खरे तर कोणत्याही बाबतीतले सत्यदर्शन हे निरपेक्षपणे स्वत:च अत्यंत मुल्यवान असते हे खरे.असत्यावर आधारलेली कल्पना दिव्य असली तरी ती कांचनम्रुगाप्रमाणे फ़सवी असते. ’जगरुढीसाठी घातले दुका” असे ’पोटदंभाचे पसार’ मांडणारे धर्माचे घाऊक व्यापारी ’चालीचाचि वाहो’ कायम ठेऊन आपल्या ग्राहकांच्या भ्रांत भावनांची खुशाल जपणूक करोत,पण संत मात्र तो मुलामा उडवून लावणेच हितावह समजतात.कारण भ्रामक कल्पनांनी कोणाचा कधीच उद्धार होत नसतो.उलट असत्याभिमान व डोळे बांधलेली श्रद्धा यांच्या पोटी शेकडॊ पापेच जन्मास येतात.
"तुका म्हणे लोपे । सत्याचिया घडती पापे " हे कसे विसरता येईल ? म्हणूनच तुकोबाराया निक्षून सांगतात-
"अहो श्रोतेवक्ते । सकळही जन ! बरे पारखून बांधा गाठी ॥
तुके तरी तुकी खर्याचे उत्तम । मुलामांचा भ्रम कोठवरी ?"
भक्तांच्या भावना दुखावतील एवढ्यासाठी सत्य दडपून टाकायचे हा धर्म आहे का ? "लटिके ते रुचे । सत्य कोणाही ना पचे ॥" म्हणून असत्यच घोपटायचे की काय ? "धर्म आहे वर्माअंगी" याची वारंवार जाणीव करून देणार्या तुकोबांनी स्पष्ट केले आहे की कोणाच्या भिडेसाठी अथवा भावनेसाठी सत्य डावलता कामा नये.’नये भिडा सांगो आन’ व ’काकुळतीसाठी सत्याचा विसर । पडले अंतर न पाहिजे॥.’त्यामुळे इथे कोरड्या कल्पना जुगारून यथार्तवादच स्विकारायला हवा.
तुकोबांचे देण:-
अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा ...
बहुजन समाजास जागरुकतेचा संदेश देऊन समता,बंधुभाव इत्यादी राष्ट्रीय सदगुणांची ओळख करून देण्यास श्री तुकाराम महाराजांची अभंगवाणी कारण ठरली असे किर्तनसम्राट श्री नित्यानंद मोहिते म्हणतात.सर्व संतांमध्ये श्री तुकाराम महाराज यांची कामगिरी विषेश नजरेत भरण्यासारखी आहे.त्यांनी आपल्या भक्तीपुर्ण,रसाळ,सोप्या अर्थपुर्ण अभंगातून जनतेमध्ये जाग्रुती निर्माण केली व म्रुतवत पडलेल्या महाराष्ट्राला अभंगरुपी संजिवनी देऊन त्यांच्यात नवचैतन्य निर्माण केले.श्री बाळशास्त्री हरदास म्हणतात,"श्री तुकाराम महाराजांमुळेच पंडीत-अपंडीत, शुद्र-अतिशुद्र, यच्चयावत बहुजन समाज देवनिष्ठेच्या आणि धर्मनिष्ठेच्या सुत्रात उपनिबद्ध होऊन पंढरीच्या पांडुरंगाच्या केंद्राभोवती एकात्म भुमिकेवर आला.श्री तुकारामांच्या ठिकाणी स्वतंत्र संप्रदाय प्रवर्तकाचे सामर्थ्य होते".तर ह.श्री.शेणोलीकर म्हणतात,"धर्माभिमान,स्वामीनिष्ठा,शरीरसुखापेक्षा धर्मनितीचे श्रेष्ठ्त्व,धर्मकर्मापेक्षा चित्तशुद्धीचे व सदाचाराचे महत्व इ.उच्चतर जीवनमुल्यांनी ओळख तुकारामांनी सामान्य जनतेला करून दिली.त्यांच्या या विधायक कार्याने शिवकार्याला उपयोगी असा ध्येयनिष्ठ,सुसंघटित व कार्यक्षम मावळा तयार झाला.त्याच मावळ्यांच्या बळावर स्वराज्यसंपादनाच्या कार्यात शिवरायांना यशस्वी होता आले".आजही तुकोबारायांचं साहित्य प्रासंगिक ठरतं.समाजोपयोगी ठरतं.ही गोष्ट केवढी मोठी आणि अभिमानाची आहे.आपली प्रगती व्हावी,गुलामीतून आपण बहुजन समाजाने बाहेर पडावे म्हणून आयुष्य पणाला लावणारे संत तुकोबाराय आम्ही असेच विसरून जायचे का ?
ह्रुदयाला घाव झाल्यावर,असंख्य शारिरीक आणि मानसिक वेदना सहन करून अगदी आतून घायाळ झालेले संत तुकोबाराय अगदी कळवळून शेवटचा उपदेश करतात.रात्रंदिवस तुमचा आमचा विचार करणारे तुकोबाराय शेवटीस काकुळतीस येवून म्हणतात...
"आतातरी पुढे हाची उपदेश।
नका करू नाश आयुष्याचा ॥
सकळ्यांच्या पाया माझे दंडवत ।
आपुलाले चित्त शुद्ध करा ॥"
म्हणूनच माझे तुकोबा जगावेगळे होते,त्यांचे कार्य समाजासमोर योग्य अर्थाने येण्याची गरज आहे,शालेय अभ्यासक्रममधूनही तुकोबांची अभंग,त्याचे संस्कार बालमनावर रुजवणे गरजेचे आहे..हजारो देवाना भजण्यापेक्षा तुकोबाराय विठ्ठलालाच भजतात...
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥
तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥
मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥
तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥
३
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥
गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥
विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥
तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥
४
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥
कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ध्रु.॥
मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥२॥
कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयानो ॥३॥
सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥४॥
५
कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥
ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥
कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥२॥
गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तें चि रूप ॥३॥
झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥४॥
तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥५॥
आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥
कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक । तयाचा हरिख वाटे देवा ॥ध्रु.॥
गीता भागवत करिती श्रवण । आणीक चिंतन विठोबाचें ॥२॥
तुका म्हणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥३॥
ऐका महिमा आवडीचीं । बोरें खाय भिलटीचीं ॥१॥
थोर प्रेमाचा भुकेला । हा चि दुष्काळ तयाला । अष्टमा सिद्धींला । न मनी क्षीरसागराला ॥ध्रु.॥
पव्हे सुदामदेवाचे । फके मारी कोरडे च ॥२॥
न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे । तुका म्हणे भक्तीपुढें ॥३॥
कन्या सासुर्यासि जाये । मागें परतोनी पाहे ॥१॥
तैसें जालें माझ्या जिवा । केव्हां भेटसी केशवा ॥ध्रु.॥
चुकलिया माये । बाळ हुरू हुरू पाहे ॥२॥
जीवना वेगळी मासोळी । तुका म्हणे तळमळी ॥३॥
तुकोबांचा विद्रोह:-
वैदिक धर्मात वेदालाच प्रमाण मानत,त्यानुसारच समाजरचना ,न्याय निवाडा सर्व व्यवहार चाले त्याच काळात तुकोबांनी खरा धर्म काय ते सांगितले त्याच बरोबर वेदाचाही अर्थ काय तेही तुकोबाराय सांगतात..ते म्हणतात,वेदाचा खरे पाहता,वेदपाठ करणाऱ्यानाच त्याचा अर्थच कळत नाही आणि इतरांना तर वेदश्रवण-पठणाचा अधिकारच नाही. ‘वेदाचें गव्हर न कळे पाठकां। अधिकार लोकां नाही येरा’ असे ते सांगत होते. हे वैदिक म्हणजे निव्वळ हमाल. धनाने भरलेला हंडा घेऊन जाणाऱ्या मजुराला जसा आतील धनाचा लाभ नसतो, नुसत्याच पाहणाऱ्याला जशी खाण्याची गोडी अनुभवता येत नसते, तसेच त्यांचे. अशी टीका करत असतानाच तुकोबा आत्मविश्वासाने सांगत होते- वेदाचा अर्थ त्या भारवाहकांना नव्हे, तर केवळ आम्हालाच ठाऊक आहे.
‘वेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा।
येरांनी वाहावा भार माथां।
खादल्याची गोडी देखिल्यासी नाहीं।
भार धन वाही मजुरीचें।।’
मग वेदाचा खरा अर्थ काय आहे?
तुकोबा सांगतात..
‘वेद अनंत बोलिला। अर्थ इतुलाचि शोधिला।।
विठोबासी शरण जावें। निजनिष्ठा नाम गावें।।
सकळशास्त्रांचा विचार। अंतीं इतुलाचि निर्धार।।
अठरापुराणी सिद्धांत। तुका म्हणे हाचि हेत।।’
वेदांनी अनेक विषय सांगितले आहेत. पण त्यांचा मुख्य अर्थ हाच की, विठ्ठलाला शरण जाऊन निजनिष्ठेने त्याचे नाम गावे. सगळ्या शास्त्रांचा, अठरा पुराणांचा हाच सारांश आहे, सिद्धान्त आहे. याही पुढे जाऊन ते म्हणतात- विठ्ठल हा शास्त्रांचे सार आहे, वेदांची मूर्ती आहे. आणि तोच आमचा सांगाती, प्राणसखा आहे.
‘म्हणऊनि नाही आणिकांचा पांग।
सर्व झालें सांग नामें एका।।’
विठ्ठलाच्या नावातच सगळा वेदांचा अर्थ आहे, असे सांगून तुकोबा वेदप्रामाण्यावर आधारलेल्या सनातन वैदिक धर्माला धक्का देत आहेत. ‘नेणती वेद श्रुती कोणी। आम्हां भाविकांवाचूनि।।’ असे म्हणत ते ब्राह्मणांच्या अधिकारांनाही आव्हान देत आहेत. वेदांचा बोल ऐकण्याचाही अधिकार ज्या वैश्य, शूद्र, चांडाळांना नाही, त्यांच्यापुढे ते हा नवाच वेदार्थ ठेवत आहेत.
‘सकळ शास्त्रांचे सार। हें वेदांचे गव्हर।
पाहतां विचार। हाचि करिती पुराणें।।
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र। चांडाळांही अधिकार।
बाळें नारीनर। आदिकरोनि वेश्याही।। ’
पंढरीचा हा जो स्वामी आहे तोच सकळ शास्त्रांचे सार आहे. वेदांचाही मुख्यार्थ तोच आहे. सर्व वर्णीयांना, आबालवृद्धांना, स्त्री-पुरुषांना, एवढेच काय- चांडाळ आणि कसबिणींनाही त्याच्या भक्तीचा अधिकार आहे असे ठामपणे ते सांगत आहेत. ‘शूद्रवंशी जन्मलो। म्हणोनि दंभे मोकलिलो’,असेही महाराज म्हणतात,
‘बरें देवा कुणबी केलो। नाही तरी दंभे असतो मेलो’ अशी चपराक देत आहेत.
वर्णभेद, जातिभेद, त्यातून आलेली पुरोहितशाही यांना हा असा रांगडा विरोध हा तुकोबांच्या संघर्षांचा केंद्रबिंदू आहे. आता हा विरोध केवळ चंद्रभागेच्या वाळवंटापुरताच मर्यादित आहे, अध्यात्माच्या क्षेत्रापुरताच सीमित आहे; तो सामाजिक पातळीवर नाही, असे म्हणणे सोपे आहे. पण ज्या समाजात शतकानुशतके सर्वच पातळ्यांवर अत्यंत खोलवर चातुर्वण्र्य व्यवस्था रुजलेली आहे, जिच्या समर्थनार्थ सगळे धर्मग्रंथ उभे आहेत, धार्मिक कायदा जिच्या बाजूला आहे, त्या व्यवस्थेला त्या काळात अध्यात्माच्या क्षेत्रापुरता का होईना, विरोध करणे हे किती कठीण काम होते, हे पुढे खुद्द तुकोबांनाच जे सहन करावे लागले त्यावरून सहज लक्षात यावे. दुसरी बाब म्हणजे अध्यात्मातील समतेच्या पुरस्काराने विषमतेचे समर्थक जर एवढे संतापत असतील, तर त्या समतापुरस्काराचा परिणाम अध्यात्म क्षेत्रापुरताच मर्यादित होता असे तरी कसे म्हणता येईल? तरीही न डगमगता त्यांनी हे वेदाधारित पाखांड मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रयत्नांना जोड होती अभ्यासाची, नैतिकतेची, आत्मविश्वासाची. ते म्हणतात, वेदान्त वेदान्त तुम्ही आम्हाला काय सांगता? ‘तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदान्त वाहे पाणी।।’ कारण-
‘तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते।
स्वयंभू आइते केले नव्हों।।’
आम्ही साधेसुधे नाही, तर विधीचे बाप आहोत! आम्ही स्वत:सिद्ध आहोत!!
(विद्रोही तुकाराम- या डॉ. आ.ह. साळुंखे यांच्या ग्रंथामध्ये तुकोबांचा खरा विद्रोह व त्यांचे अनेक पैलू आपणास पाहायला मिळेल.
तुकोबांचा मृत्यू :-
तुकोबांच्या मृत्यू बाबत दोन मत प्रवाह आहेत,एक म्हणजे सदैव वैकुंठ तर दुसरा प्रवाह म्हणजे तुकोबांचा खून करण्यात आला.
संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या निर्वाणासंबंधी आजपर्यंत अनेकांनी चर्चा केली आहे."महाराष्ट्र सारस्वत"कार भावे यांच्या पासून ते आत्तापर्यंतचे साहित्यिक यात आहेत.श्री वा.सी.बेंद्रे यांसारखे संशोधकही यामध्ये आहेत.यांच्या मालिकेत आजच्या सामाजिक संघटनांचा देखील समावेश करावा लागेल.संत तुकारामांचा खुनच केला असावा असे स्पष्टपणे प्रतिपादन करणारेही बरेच होऊन गेले.इतकेच काय पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही "मेला की मारला कळेना । म्हणती वैकुंठाला गेला ।" या आपल्या उद्गारात याच प्रमेयाकडे संकेत केला आहे.
निर्वाण अभंग आणि अभंगपत्रे
संतश्रेष्ठ तुकोबांच्या निर्वानाचा प्रश्न त्यांच्याच अभंगाच्या द्वारे सर्वांनी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.मग त्यात मत-मतांतरे का निर्माण व्हावीत ? यातील एक महत्वाची गोष्ट अशी की, संतांच्या आज ज्या गाथा आढळतात त्यात त्यांनी हे लिहिलेले अभंग कालानुक्रमाने दिलेले असतात असे मुळीच नाही.संत तुकारामांच्या अभंगातही असेच झालेले आहे.आपल्या आयुष्यात अभंगरचना करताना कदाचित स्वत: तुकाराम महाराजांनी किंवा त्यांच्या लेखनिकांनी ते क्रमश: लिहुन ठेवलेलेही असतील.पण आज कालानुक्रमाने लिहिलेल्या अशा अभंगाचा अस्सल गाथा उपलब्ध नाही.आहे त्या अभंगाची विषयावार विभागणी करून ते छापलेले आहेत.उपलब्ध गाथ्यात सर्वत्र ही विषयविभागणी आणि त्यात अंतर्भूत केलेल्या अभंगाची संख्या ही सारखी आढळते अशी नाही.अशा विषयविभागणीच्या प्रयत्नातूनच तुकाराम महाराजांच्या अंत्यकाळाविषयीच्या अभंगाचे प्रकरण निर्माण झाले आहे.
निरनिराळ्या गाथ्यात आढळणार्या अशा निर्वाण प्रकरणातील अभंगाची तर्ककठोर बुद्धीने छाननी केली तर समजुन येईल की हे निर्वाणाचे अभंग केवळ संकलनात्मक आहेत.प्रत्येक संपादकाने वेगवेगळ्या अभंगसंचातून आपल्याला सोईचे वाटतील असे किंवा ओढून ताणून उपयोगी आणता येतील असे असंबद्ध विषयींचे अभंग आपापल्या संपादणीतील निर्वाण प्रकरणात संकलीत केले आहेत.इतकेच नाही तर तुकोबांच्या निर्वाणासंबंधी आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ काही प्रक्षिप्त अभंगही त्यात घातले गेले आहेत.या संकलनाबाबत एक दोन उदाहरणे पुरेशी आहेत.
१] "क्र.१५९६ या अभंगात गरुडावर बसून चतुर्भुज हरी वैकुंठाहुन तुकोबांच्या घरी येतात..क्र.१६०६ मध्ये श्रीरंगाशेजारी गरुडावर बसण्याऐवजी तुकोबा एकदम कुडीसहीत गुप्त होतात...गुप्त झाल्यानंतरही अभंग सुरुच असतात.क्र.१६०७ मध्ये तर आत्तापर्यंतच गरूड विमानात परिवर्तीत होतो आणी तुका बैसला विमानी हे द्रुष्य़ संत लोचनी पाहू शकतात. याच अभंगाच्या शेवटी तुका वैकुंठासी नेला तरी देखील १६०८ हा अभंग जन्मास येतोच.त्यात तर तुकोबा ’क्षीरसागर शयनी’ पोहचून सिंहासनी बसले आहेत.तो अभंग इहलोकी कसा म्हंटला गेला ? आणि क्षीरसागरी पोहचल्यानंतर वाराणसीपर्यंत असो सुखरूप (क्र.१६०९) असा काशीला पोहचल्याचा निरोप कसा काय आला ? या शेवटच्या अभंगात आपण येथून निजधामास जाणार असे तुकोबा म्हणतात..येथे तुकोबांबरोबर देव नाही पण गरूड मात्र आहे ! ..अशी ही सारी विसंगतीची चमत्क्रुती !"
२] "चार कोसांवर विमान थांबवून जर हे अभंग लिहिले तर ’सकळही माझी बोळवण करा’ हे म्हणजे भुमीवरचे की आकाशातले ? ’उठा एक ऐका सांगतो तुम्हासी’..अशी सहा ओळीत तीनदा सांगण्याची पुनुराव्रुत्ती व्हावी,हे तुकोबांना सर्वथा अमान्य असणार्या रचनाशैथिल्याची कल्पना आणुन देण्यास पुरेसे नाही का ? स्वपत्नीसाठी येतो काकुलती मनी धरा म्हणून ’पदर पसरून दाढी ओठी’ धरून केविलवाणीने लोकांची मनधरणी करावी..देवासह वैकुंठी जाण्याचे अपुर्व भाग्य लाभले असताही ’अहो देवा ! कैसी घरबुडवण केली’ म्हणून आकांत करावा आणि ’देवांचे ते मुळ शोधू नये कोणी’ असा भलताच उपदेश करावा हे सारे तुकोबांच्या व्यक्तित्वाशी सुसंगत असेच आहे का ? ..’म्हणे मज आता निरोप द्यावा- ऐसे बोलो निया गुप्त झाले’ ही सारी रचना तुकोबांचीच आहे असे म्हणता येईल का ?..."
श्री तुकोबा महाराज विमानात बसुन सदेह वैकुंठाला गेले असे मानणार्या प्राचीनांनीच त्यांची ’विमानातून लिहिलेई अभंगरुप पत्रे’ निर्माण केली आहेत.असे का म्हणू नये ? ’चौकोशावरी थांबवली विमाने । पत्र हे तेथून तुम्हा लिहिले’ व ’स्वर्गलोकीहुनि आले हे अभंग’ या वचनांमधील ’तेथून’ व ’आले’ हे शब्द स्पष्टच सुचवितात की ते शब्द प्रुथ्वीवरील व्यक्तीच उच्चारू शकते.शिवाय ’चौकशा’वर ’स्वर्गलोक’ असू शकत नाही.’सप्त अभंगी पत्र’ व ’बारा अभंगी पत्र’ या दोन्ही बरोबर ’टाळगोधडी’ चा उल्लेख आहेच.तेंव्हा,तुकोबांबरोबर ’टाळगोधड्या तरी किती कल्पाव्या ? "तुकोबांचे निर्वाण झाले द्वितीयेस तर टाळगोधडी मिळाली पंचमीस ! हे साहित्य नेमके देहुलाच पडले" हे वास्तवतेच्या पलिकडचे नव्हे काय ? अशा भाकडकथा सांगणारे अभंग प्रक्षिप्त नव्हे तर काय म्हणावे ?. शुद्ध संशोधनासाठी देवधर्म आणि अंधश्रद्धा यांमध्ये बुडालेले कोणी भक्त म्हणतील की लोकमाणसात वैकुंठगमनाची दिव्य कल्पना शेकडो वर्ष द्रुढमुल झाली असता आता हे नव्याने मांडून कोणते कल्याण होणार आहे ? "जाले तेंव्हा जाले मागील ते मागे । आता वर्म लागे ठावी झाली ॥" हे सत्य असले तरी गडे मुर्दे उकरून लाभ काय ? हा प्रश्न बराच महत्वाचा आहे..खरे तर कोणत्याही बाबतीतले सत्यदर्शन हे निरपेक्षपणे स्वत:च अत्यंत मुल्यवान असते हे खरे.असत्यावर आधारलेली कल्पना दिव्य असली तरी ती कांचनम्रुगाप्रमाणे फ़सवी असते. ’जगरुढीसाठी घातले दुका” असे ’पोटदंभाचे पसार’ मांडणारे धर्माचे घाऊक व्यापारी ’चालीचाचि वाहो’ कायम ठेऊन आपल्या ग्राहकांच्या भ्रांत भावनांची खुशाल जपणूक करोत,पण संत मात्र तो मुलामा उडवून लावणेच हितावह समजतात.कारण भ्रामक कल्पनांनी कोणाचा कधीच उद्धार होत नसतो.उलट असत्याभिमान व डोळे बांधलेली श्रद्धा यांच्या पोटी शेकडॊ पापेच जन्मास येतात.
"तुका म्हणे लोपे । सत्याचिया घडती पापे " हे कसे विसरता येईल ? म्हणूनच तुकोबाराया निक्षून सांगतात-
"अहो श्रोतेवक्ते । सकळही जन ! बरे पारखून बांधा गाठी ॥
तुके तरी तुकी खर्याचे उत्तम । मुलामांचा भ्रम कोठवरी ?"
भक्तांच्या भावना दुखावतील एवढ्यासाठी सत्य दडपून टाकायचे हा धर्म आहे का ? "लटिके ते रुचे । सत्य कोणाही ना पचे ॥" म्हणून असत्यच घोपटायचे की काय ? "धर्म आहे वर्माअंगी" याची वारंवार जाणीव करून देणार्या तुकोबांनी स्पष्ट केले आहे की कोणाच्या भिडेसाठी अथवा भावनेसाठी सत्य डावलता कामा नये.’नये भिडा सांगो आन’ व ’काकुळतीसाठी सत्याचा विसर । पडले अंतर न पाहिजे॥.’त्यामुळे इथे कोरड्या कल्पना जुगारून यथार्तवादच स्विकारायला हवा.
तुकोबांचे देण:-
अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा ...
बहुजन समाजास जागरुकतेचा संदेश देऊन समता,बंधुभाव इत्यादी राष्ट्रीय सदगुणांची ओळख करून देण्यास श्री तुकाराम महाराजांची अभंगवाणी कारण ठरली असे किर्तनसम्राट श्री नित्यानंद मोहिते म्हणतात.सर्व संतांमध्ये श्री तुकाराम महाराज यांची कामगिरी विषेश नजरेत भरण्यासारखी आहे.त्यांनी आपल्या भक्तीपुर्ण,रसाळ,सोप्या अर्थपुर्ण अभंगातून जनतेमध्ये जाग्रुती निर्माण केली व म्रुतवत पडलेल्या महाराष्ट्राला अभंगरुपी संजिवनी देऊन त्यांच्यात नवचैतन्य निर्माण केले.श्री बाळशास्त्री हरदास म्हणतात,"श्री तुकाराम महाराजांमुळेच पंडीत-अपंडीत, शुद्र-अतिशुद्र, यच्चयावत बहुजन समाज देवनिष्ठेच्या आणि धर्मनिष्ठेच्या सुत्रात उपनिबद्ध होऊन पंढरीच्या पांडुरंगाच्या केंद्राभोवती एकात्म भुमिकेवर आला.श्री तुकारामांच्या ठिकाणी स्वतंत्र संप्रदाय प्रवर्तकाचे सामर्थ्य होते".तर ह.श्री.शेणोलीकर म्हणतात,"धर्माभिमान,स्वामीनिष्ठा,शरीरसुखापेक्षा धर्मनितीचे श्रेष्ठ्त्व,धर्मकर्मापेक्षा चित्तशुद्धीचे व सदाचाराचे महत्व इ.उच्चतर जीवनमुल्यांनी ओळख तुकारामांनी सामान्य जनतेला करून दिली.त्यांच्या या विधायक कार्याने शिवकार्याला उपयोगी असा ध्येयनिष्ठ,सुसंघटित व कार्यक्षम मावळा तयार झाला.त्याच मावळ्यांच्या बळावर स्वराज्यसंपादनाच्या कार्यात शिवरायांना यशस्वी होता आले".आजही तुकोबारायांचं साहित्य प्रासंगिक ठरतं.समाजोपयोगी ठरतं.ही गोष्ट केवढी मोठी आणि अभिमानाची आहे.आपली प्रगती व्हावी,गुलामीतून आपण बहुजन समाजाने बाहेर पडावे म्हणून आयुष्य पणाला लावणारे संत तुकोबाराय आम्ही असेच विसरून जायचे का ?
ह्रुदयाला घाव झाल्यावर,असंख्य शारिरीक आणि मानसिक वेदना सहन करून अगदी आतून घायाळ झालेले संत तुकोबाराय अगदी कळवळून शेवटचा उपदेश करतात.रात्रंदिवस तुमचा आमचा विचार करणारे तुकोबाराय शेवटीस काकुळतीस येवून म्हणतात...
"आतातरी पुढे हाची उपदेश।
नका करू नाश आयुष्याचा ॥
सकळ्यांच्या पाया माझे दंडवत ।
आपुलाले चित्त शुद्ध करा ॥"
संदर्भ:-
तुकाराम गाथा
तुकाराम विकिपीडिया
तुकारामाचे चरित्र, अभंग आणि त्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके[संपादन]
- विद्रोही तुकाराम : लेखक आ.ह. साळुंखे
- विद्रोही तुकाराम - समीक्षेची समीक्षा : लेखक आ.ह. साळुंखे
- तुका म्हणे : लेखक डॉ. सदानंद मोरे
- शिवचरित्र-पुरुषोत्तम खेडेकर
- तुकाराम दर्शन (डॉ. सदानंद मोरे)
- प्रतिइतिहास -चंद्रशेखर शिखरे
- विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज -श्रीमंत कोकाटे
- आनंड डोह (२०१४). नाटक - लेखक : योगेश्वर
- आनंदाचे डोही आनंद तरंग (कादंबरी, लेखिका मृणालिनी जोशी)
- तुका झाला पांडुरंग (कादंबरी, भा.द. खेर)
- तुका झालासे कळस (चित्रपट, १९६४) - दिग्दर्शक राजा नेने. या चित्रपटात तुकारामाची भूमिका कुमार दिघे यांनी केली होती.
- तुका आकाशाएवढा : लेखक गो.नी. दांडेकर
- तुकाराम गाथा (भालचंद्र नेमाडे)
- तुका म्हणे भाग १, २ : लेखक डॉ. दिलीप धोंगडे
- तुका म्हणे सोपी केली पायवाट (डॉ. अविनाश वाचासुंदर - तुकारामांच्या दैनंदिन उपयोगाच्या निवडक १५० अभंगांचे निरूपण)
- तुका झालासे कळस : लेखक डॉ. प्रभाकर श्रावण चौधरी
- तुका झालासे कळस : लेखक डॉ. रामचंद्र देखणे
- तुका झालासे कळस: लेखक अर्जुन जयराम परब
- तुका झालासे विठ्ठल : (ढवळे प्रकाशन)
- तुकाराम - अंतर्बाह्य संघर्षाची अनुभवरूपे (म.सु. पाटील)
- तुकाराम दर्शन (डॉ. सदानंद मोरे)
- समग्र तुकाराम दर्शन (किशोर सानप)
- तुकाराम महाराजांची जीवनसूत्रे : लेखक डॉ. यादव अढाऊ
- तुकाराम व्यक्तित्व आणि कवित्व : लेखक किशोर सानप आणि मनोज तायडे
- तुकारामांचा शेतकरी : लेखक डॉ. आ.ह. साळुंखे
- तुकारामाचे निवडक १०० अभंग : लेखक डॉ. दिलीप चित्रे
- तुकारामाचे निवडक १००० अभंग (व्हीनस प्रकाशन)
- तुकारामाच्या अभंगांची चर्चा (खंड १, २) (वासुदेव पटवर्धन)
- तुका विठू आणि मी : लेखिका यशश्री भवाळकर
- तुकोबा : लेखक शंकर पांडुरंग गुणाजी
- तुकोबाचे वैकुंठगमन दिलीप चित्रे
- धन्य तुकाराम समर्थ (एकपात्री), लेखक व सादरकर्ते नामदेव तळपे
- पुन्हा तुकाराम : दिलीप चित्रे
- प्रसादाची वाणी अर्थात तुका म्हणे (डॉ.सदानंद मोरे)
- मुलांसाठी तुकाराम (वामन देशपांडे)
- श्री संत तुकाराम चरित्र (अनंत पैठणकर)
- संत तुकाराम (चरित्र) (कृ.अ. केळूसकर, १८९५)
- संत तुकारामांचे अप्रकाशित अभंग (वा.सी. बेंद्रे)
- संतसूर्य तुकाराम (कादंबरी लेखक : आनंद यादव)
- 'Says Tuka (चार खंड): लेखक दिलीप चित्रे
संपूर्ण लेख साठी येथे क्लिक करा - DOWNLOAD
Excellent
ReplyDelete