भक्तीशक्ती

भक्तीशक्ती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत..!! .
web toolsHtml Codes

पद्मविभूषण मा.शरद पवार साहेब



     ‘आजन्म हरण्याचा कोठे सवाल होताजन्मताच त्यांच्या माथी गुलाल होता!
                   अखंडअविरतअद्वितीयअसामान्यअगणितअद्भुत,स्वयंभू,विजयाचे दिपस्तंभ मा.शरदजी पवार साहेब यांना संसदीय करकीर्दीमध्ये 50 वर्ष झाल्याबद्दल व जन्म दिनाबद्दल हा लेख प्रपंच व अभिनंदन !
                               साहेबांचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे १२ डिसेंबर १९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी या छोट्याश्या गावी झाला.. राजकारण व समाजकारणाचा वसा आणि वारस्याचे बाळकडू साहेबांना त्यांच्या आईकडूनच मिळाले. त्यांच्या आई शारदाबाई पवार या स्वातंत्र्यापूर्वी पुणे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात कार्यरत होत्या.तरवडील  गोविंदाराव हेदेखील सहकार चळवळीतील निष्ठावंत कार्यंकर्ते होते. तसेच त्यांचे बंधू वसंतराव शेतकरी कामगार पक्षात होते. अशा कुटुंबात पवारांची लहानपणापासूनच राजकीय-सामाजिक कार्याची जडणघडण झाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दरम्यान त्यांच्याकडे मान्यवरांची ये जा असे. याच काळात साहेबावर पैलू पडत होते. बारामती येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात शालेय शिक्षण झाले, त्या वेळी वाद-वक्तृत्व स्पर्धांतील यशक्रीडास्पर्धा – सहली – स्नेहसंमेलने यांच्या आयोजनातील त्यांचा पुढाकार म्हणजेसाहेबांची राजकरणातील पहिले पाऊलच..! १९५६ रोजी गोवामुक्तीच्या लढ्यात सहभागघेण्यासाठी विद्यार्थ्यांचा घेतलेला मेळावा तर उत्कृष्ट नेत्याची चुणुकच होती..! ही चुणूकचकाकतच   गेली..ती मागे वळून  पाहण्यासाठी..,यशोशिखर गाठण्यासाठी..समाजसेवेसाठीअहोरात्र धडपडण्यासाठी..! साहेब पुण्यातील बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय शिक्षण घेतानाही जनरल सेक्रेटरी (जी.एस.) म्हणूनएक विद्यार्थी नेता म्हणून ते महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावर कार्यरतहोते.याच काळात साहेबांनी विद्यार्थीसंघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे       मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनाआमंत्रित केले.साहेबांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे त्यांच्या    धमक  आत्मविश्वासावर यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले.आणि थेट आपल्या पक्षात साहेबाना सामाऊन घेतले...चव्हाणांनी सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर साहेब त्यांचे शिष्य बनले. शरद पवार नावाच्या हिऱ्याची पारख करायला सुद्धा आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांसारखा रत्नपारखी असणे गरजेचे होते हे काही कोणा येड्या गबाळ्याचे काम नाही.

     साहेब ऑगस्ट 1967 रोजी बारामतीस भर पावसात प्रतिभाताई यांच्या विवाह बंधनात अडकले,प्रतिभा या पुण्यातील सदू शिंदे या प्रसिद्ध माजी कसोटी क्रिकेटपटू यांच्या कन्या. पवार साहेबांना उत्तम प्रतिभेची साथ लाभल्याने त्यांच्या संसाररुपी वेलीला 'सुप्रियानावाचे एक कन्यारत्न प्राप्त झाले. आपल्या वडीलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून सुप्रिया पवार-सुळे यांनी देखील स्वकर्तुत्त्वाचा ठसा उमटवला. आणि उत्कृष्ट संसदपटूचा बहुमान मिळवला..!
         शरद पवार यांचा युवक कॉंग्रेस अध्यक्षप्रदेश कॉंग्रेस कार्यकारिणी प्रतिनिधी २४ व्या वर्षी तर ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. वयाच्या अवघ्या २६-२७ व्या वर्षी ते आमदार  वयाच्या केवळ ३८ व्या वर्षी ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदीविराजमान झाले. १९७८१९८८ १९९०१९९३  असे चार वेळा त्यांनी विविध कालावधीसाठी मुख्यमंत्रीपद सांभाळले. दरम्यान केंद्रीय संरक्षण खात्याची जबाबदारीही त्यांच्यावर पडली,त्यांनी असा राजकीय प्रवास होत गेला. याच काळात त्यांनी महाराष्ट्र डोळाभरून हृदयात कोरून ठेवत न थकता,  सर्वसामान्य माणसांशी हितगुज करून त्यांच्याशी संवाद साधला,साहेबाना शालेय जीवनापासूनच  साहित्यअन्य कलाक्रीडासमाजसेवाउद्योगपत्रकारिता आदीची आवड होती या सर्व क्षेत्रांतील दिग्गजांशीमान्यवरांशीअभ्यासकांशी भेटीनेत्यांच्यांशी साहेबांचे स्वाभाविक संबंध प्रस्थापित झाले. मैत्रीचे ऋणानुबंध कसे असावेत तर पवार साहेबांसारखे...कारण राजकारणा पलीकडे त्यांचे हे नाते आहे,त्यामध्ये स्व.बाळासाहेब ठाकरे असो,विलासराव असो,गोपीनाथराव असो..रतन टाटा असो वा राहूल बजाज किंवा अनिलमुकेश अंबानी असो वा अन्य कुणी उद्योगपती त्यांना शरद पवार जवळचे व आदरातिथ्य वाटतात. साहित्य क्षेत्र,नाटक यातील सर्वांशी साहेबांची मैत्री आहे,
   पवार साहेबांचा वाचनाचा व्यासंग तर खूप दांडगा.. त्यांच्या वैयक्तिक संग्रहात अनेकदा नवीन आलेली पुस्तकं आढळतात. यशंतराव चव्हाण सेंटर  मुंबईत पु. ल. देशपांडे भवनउभारण्यात साहेबांचा मोठा वाटा आहे.
       गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा,माणसांच्या गराड्यात राहूनही साहेब मुक्त असतात..! हा मुक्तपणा साहेब खुबीने ठेवतात,हिमालयाची उंची मिळवत असताना ग्रामीण भागाशी नाळ आणि दिल्लीवर छाप असणारा महाराष्ट्रातील एकमेव सह्याद्री म्हणजे साहेब..! पण या यशामागे प्रचंड कष्ट आहेत. कामातील व्यग्रतासखोल नियोजनशिस्तबद्ध दैनंदिनीत्यातील कमालीचे सातत्यशांतपणाविरोधकांनी केलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या जंजाळातून वाटचाल करताना हा नेता कधीही डगमगला नाही, ह्यातून बहुजन समाजाच्या एका मोठ्या नेत्याला फक्त बदनाम करायचं ह्यासाठीच हे आरोप केले जातात हे अनेकदा दिसून येते,मुत्सद्दीपणा अन्‌ भविष्याचा वेध घेत वाटचाल करणाऱ्या व्यक्ती मोजक्याच असतात त्यापैकी साहेब एक कारण नेपोलियनच्या शब्द कोशात अशक्य हा शब्द नव्हता तर साहेबांच्या शब्द कोशात विश्रांती हा शब्द नाहीच.. चांद्यापासून बांद्यापर्यंतचा जनसंपर्क पहिला तर कधी कधी असे वाटते महाराष्ट्राचा नकाशा साहेबांच्या तळहातावरच आहे.
     माणसे जिंकणे हा साहेबांचा आवडता व्यवसाय,त्यांचे राजकीय जीवन आणि व्यक्तिगत जीवन असे त्यांनी स्वतःच्या जीवनाचे दोन भाग पाडून घेतलेले आहेत,राजकीयपेक्षा व्यक्तिगत मैत्रीला त्यांनी अधिक स्थान दिल,HUMAN RELATIONSHIP IS THE BIGGEST STRENGTH OF THE POLITICSअसा हा मोठ्या मनाचा आणि विशाल अंत:करणाचा नेता म्हणजे साहेब...!
नितीमत्ता,कुशाग्र बुद्धिमत्ता,दांडगी स्मरणशक्ती,सहनशक्ती,परोपकारीता,लोकमान्यता, कोणत्याही समस्यांच्या मुळाशी जाऊन ती समजून घेण्याची त्यांची सवय,असे असंख्य गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आढळतात. प्रशासकीय कौशल्येकार्यकर्ते-नेते शोधण्याची नेमकी दृष्टीप्रचंड जनसंपर्ककार्यकर्त्यांशी थेट संपर्क तर पहायलाच नको कारण..साहेबांचा हात एखाद्या कार्यकर्त्यांवर नुसता पडण्याचा अवकाश तोच तो कार्यकर्ता असा घुमतो जसा काही तो मृदुंगच...!
   साहेब म्हणजे सहकार क्षेत्रातील म्हसिहाच...कारण सहकार म्हणजे काय तर TO THE PEOPLE,FOR THE PEOPLE AND BY THE PEOPLE या उक्तीला सार्थ ठरवत सहकार एका उंचीवर नेऊन ठेवणारा नेता म्हणजे साहेब..साहेबांनी माजी सैनिकांच्या निवृत्तीवेतनात वाढफळबाग विकास योजनापोलिसांची `हाफ पँट’ जाऊन `फुल पॅंट’ करण्याचा निर्णयमहाराष्ट्रात सहकार क्षेत्राचा साधलेला विकाससाखर कारखाने क्षेत्रातील योगदानमुंबईतील दंगली-किल्लारी भूकंप या संकटांनंतर हाताळलेली परिस्थितीमहिला आरक्षण विषयातील भूमिका व निर्णयमाहिला बचत गटांना बळ देण्याचे धोरणराज्यातील वंचित घटकांसाठीचे त्यांचे धोरण व त्यांचे निर्णय पाहिले तर आपल्या लक्षात येईल की,दुर्बलांना दातृत्वान सबल करण्याचा आनंदच सर्वश्रेष्ठ आहे अशी त्यांची राजकीय आयुष्यातील अनेक ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील.
     खरंतर बारामती-काटेवाडीच्या ढेकळांतुन वर आलेला हा दकट "जाणता राजा" राजकारण दशकानुदशके आपल्या अक्षाभोवती फिरत ठेवतोय हे काय साधी गोष्ट नाही.अनेक वादळांना सामोरा जाणारा एक शांत प्रशांत महासागर ,आपला विश्वास आणि संयम कधीही ढळू न देणारा जेता ,राजकीय संस्कृतीचा वारसा तेवढ्याच पावित्र्याने जपणारा कर्मयोगी, जगात कुठेही असो पण मनात सदैव बळीराजासाठी  धडपडणारा अस्सल काळ्या मातीतला शेतकरी नेता म्हणजे साहेब...
   राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीपासून ते पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा व लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. बारामती एम.आय.डी.सीविद्या प्रतिष्ठान (शैक्षणिक संस्था)कृषिविकास प्रतिष्ठानशारदाबाई पवार शिक्षण संस्था… आदी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी बारामती परिसराचा सर्वांगीण विकास साधला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची कारकीर्द हा त्यांचा आणखी एक वेगळा पैलू. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. साहेब क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असताना भारत दोन वेळा वर्ल्ड कप जिंकला,त्यामुळे देशाची मान संपूर्ण जगात उंचावली.म्हणून त्यांच्यातील एक क्रीडाप्रेमीआधुनिक नेता आपण अनुभवला.  आदरणीय शरद पवार साहेब समजायला मातीतलं असाव लागतं,ACतल नाही..साहेब म्हणजे न संपणारा स्टँमिना आहे.गंभीर आजारही त्यांना एक जागी खिळवू शकला नाही,शरद पवार ही न संपणारी उमेद आहे,महत्वकांक्षा आहे.त्यांच्यातील ती व्हील पावर हीच खरी पावर आहे,आयुष्याच्या या उंबरठ्यावर असूनही मनाने निर्धारपूर्वक संध्याछाया दूर ठेवत समाजाचा आधारवड बनून राहणारा नेता म्हणजे साहेब..!
  महाराष्ट्राच्या कुटुंब वैभवातील लोकोत्तर गुणसंपदा लाभलेल्या या लोकप्रिय समाजपुरुषाने महाराष्ट्रासाठी,देशासाठी अनेक संपन्न खेळी खेळल्या आता जीवनाची शतकी खेळी करावी अशीच तमाम महाराष्ट्र वासीयांची ईश्वरचरणी प्रार्थना ...म्हणून झाले बहु होतील बहु पर या सम हा..!
अशा या लोकनायकास,जाणत्या राजास आऊसाहेब जिजाऊ उदंड आयुष्य देवो...!
   साहेबांस वाढदिवसाच्या आभाळभर शिवशुभेच्छा...!!
राष्ट्रपती प्रणव मुखर्जीं... दिल्लीतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पवार गेले आणि अवघ्या आठवड्याभरात मुंबईत स्फोट झाले. पवारांनी एवढं मोठं प्रकरण मोठ्या शिताफीनं हाताळलं.     
पंतप्रधान मा.नरेंद्र मोदींचे शरद पवारांबद्दल गौरवोद्गार....शरद पवार हे सामान्य समाजातून आलेले नेते असून त्यांची नजर जिथपर्यंत पोहोचेलतिथून त्यांच्यासाठी सलाम’ येईलअसे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांप्रती काढले.  शरद पवारांची पाच दशकांपेक्षा जास्त एकनिष्ठ साधना आहे. पवारांचा शेतीविषय अभ्यास मार्गदर्शक आहे. शेती क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यासाठी शरद पवारांचे कायम प्रयत्न असतात. क्रिकेट बद्दल विषयांवर जरी चर्चा चालू असलीतरी पवार शेती क्षेत्रातील विषयांवर चर्चा करतात.”, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. शिवायदेशात राजकीय वारे कुठे वाहत आहेतहे जाणून घ्यायचं असेल तर शरद पवारांना भेटावंअसंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. शरद पवार आणि माझं महिन्यातून दोन ते तीन वेळा बोलणं होतं.गुजरातमध्ये मला काही अडचणी आल्या तर मी शरद पवार यांचे विचार घ्यायचो.                                    
    राज्यपाल सी. विद्यासागर ... शरद पवार हे केवळ राजकीय नेतेच नाहीततर खरे राजकीय गुरू आहेत.                                                                              मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ..महाराष्ट्र राज्याच्या विकासाची दिशा ठरविण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महत्वपुर्ण भूमिका बजावली असून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि मार्गदर्शनाचा फायदा नेहमीच महाराष्ट्र व देशाला झाला.                                                                                   
    सुशीलकुमार शिंदे ..'माझ्या करंगळीला पकडून पवारसाहेबांनी मला राजकारणात आणले,कधी देशाचा गृहमंत्री झालो कळलंच नाही'                                                                                                      
 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी- औरंगाबाद दि.२९/७/२०१७..साहेबांचा प्रत्येक कार्यकर्ता हा नेता असून पवार साहेब नावाचं झाड राजकारणात इतक खोलवर गेलंय,त्याची मुळं इतकी खाली गेली आहेत की ते हलवायला गेलं की वरच्या पानाप्रमाणे अनेक मतदारसंघ एकडले तिकडे हलायला लागतात  
 उद्धव ठाकरे म्हणतात... राजकारण काहीही असो... शरद पवार ही एक वेगळीच व्यक्ती आहे... ते एक वेगळंच रसायन आहेअसं यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलं. तर त्यावेळीच पवारांचा 'बारा'चा महिमाही त्यांनी वर्णन केला... आज तारीख बारा... महिना बारावा... पवारांची 'बारा'मती... आणि अनेकांचे बाराही वाजवलेत! असं म्हणत त्यांनी टाळ्या मिळवल्या.                                                                                             
                         राज ठाकरे म्हणतात... यावेळीइथं पवारांसोबत बाळासाहेब हवे होतेअसं म्हणत राज ठाकरेंनी भावनिक साद घातली. पवारांचा जास्तीत जास्त सहवास हा वर्तमानपत्रांतून लाभल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. तसंच पवारांनी स्तुती केली की भीती वाटतेप्रत्येक घटनेत पवारांचा हात असतोअसं म्हणत आपली खास ठाकरे शैलीही त्यांनी यावेळी वापरली.                                                                                                   
             धनंजय मुंढे.. विरोधी पक्षनेता विधान परिषद  -साहेबांचे सानिध्य लाभले मी खरा भाग्यवंत...  
 मा.मुख्यमंत्री नारायण राणे ..तरुण राजकारण्यांसाठी पवार साहेब हे चालतं बोलतं विद्यापीठ आहेया शब्दांत नारायण राणे यांनी शरद पवार यांचे कौतुक केले.                              
मा.मंत्री जयंत पाटील ..आदरणीय शरद पवार हे व्यक्ती नसून एक युग आहे. महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाताना शरद पवार राजकारणात येण्यापुर्वीचा महाराष्ट्र आणि शरद पवार राजकारणात आल्यानंतरचा महाराष्ट्र अशीच या राज्याच्या इतिहासाची विभागणी होईल" - जयंत पाटील.      
    विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील ..कृषीसहकारक्रिडा,औधोगिक क्षेत्रात पवारांनी दिलेले योगदान नक्कीच कौतुकास्पद आहे. अभ्यासू नेतृत्वचांगले वकृत्वदांडगा जनसंपर्कनियोजन कौशल्य राजकीय मुत्सद्दीगिरी त्यांचे आदी गुण वाखाण्याजोगे आहेत.
            काँग्रेस नेते पतंगराव कदम ..म्हणाले महाराष्ट्राच्या अक्षांश-रेखांशाचीआणि महाराष्ट्राच्या इतिहास व भूगोलाची खडान्-खडा माहिती असणारा नेता म्हणून पवार साहेबांची ओळख आहे.        
मा.मंत्री  एकनाथ खडसे..शरद पवार हे राजकारण्यांसाठी आधारवड आहेत. पवारांचे सर्वांशीच जिव्हाळ्याचे संबंध असल्याचं एकनाथ खडसे यांनी प्रांजळपणे कबूल केलं.                                           
            आ.जितेंद्रजी आव्हाड  पवार साहेबांचा लोकशाहीवर प्रचंड विश्वास असून ज्यांना सत्तेच्या दरवाज्यापासून कोसो दूर रहावं लागत होतं त्यांना सत्तेच्या केंद्रापर्यंत नेण्याचं काम शाहूंनंतर पवार साहेबांनी केलंअसे म्हटले.                                            
           आमदार हसन मुश्रीफ.."मला आई वडिलांनी जन्म दिला आहेपरंतू साहेबच माझे राजकीय मार्गदर्शक आहेत. पुरोगामी विचारांची खाण असलेले साहेब माझ्यासाठी दैवत आहेत. माझ्या साहेबांना उदंड आयुष्य लाभो. साहेब दुर्दम्य आजारावर मात करत सामान्य माणसांच्या आशीर्वादाच्या बळावर आभाळाएवढे मोठे झाले आहेत. यमाच्या दाराला कुलूप लावून साहेब आले आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो," असे सांगताना आमदार हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले.                                                          
  मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार..पवार साहेब माझे दैवत..!   
 मा.सुप्रियाताई सुळे..माझे आई-बाबा जगातील सर्वोत्तम पालक आहेत,त्यांनी माझ्यावर उत्तम संस्कार केले,अशा आई-वडिलांच्या पोटी माझा जन्म झाला याबाबत मी भाग्यवान आहे..!!          
                                                                                                                                  शिवश्री संतोष भगवान तळेकर                                                                                                                             प्रा.शिक्षक जि.प.शाळा खानिव,ता.डहाणू,जि.पालघर                    हा लेख    pdf DOWNLOAD  करा                                                     8275941474                                                                                                                                      https://www.facebook.com/profile.php?id=100004853207402

No comments:

Post a Comment