भक्तीशक्ती

भक्तीशक्ती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत..!! .
web toolsHtml Codes

वृक्ष वल्ली आम्हा सोयरे

                                   वृक्ष वल्ली आम्हा सोयरे
वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे”              
           
हाती चित्रगुप्ताची लेखणी घेऊन बसलेले सुज्ञ परीक्षक गण,दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे आदरणीय गुरुजन वर्ग,वक्तृत्वाचे उधळलेले मोती वेचण्यासाठी जमलेल्या माझ्या उद्याच्या भारताच्या भविष्यानो..नमस्कार .मी------------------------------------आपणा समोर वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे या विषयावर माझे मनोगत व्यक्त करणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकाल अशी आशा बाळगते..!
             
वृक्ष आमचे मित्र तयांना तोडू नका कोणी..
             
तोडू नका कोणी तयांना तोडू नका कोणी...! त्याच बरोबर,किलबिल किलबिल पक्षी बोलती,झुळझुळ झरे वाहती स्वप्नी आले काही अहो ही फक्त स्वप्नातच पाहवं लागते की काय असे वाटत आहे,कारण ही वाक्य आजकाल फक्त पुस्तकात,कवितेत,शाळेतच ऐकायला मिळतात.प्रत्येक्षात काय हाल आहेत ही वसुंधरा ओसाड झाली आहे..पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे.त्यामुळे दुष्काळ पडतो आहे,प्रदूषण वाढले आहे..प्राणवायू मिळेनासा झाला आहे.तासभर ऑक्सिजन विकत देणा-या डॉक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणा-या झाडांची कदर केली जाते का ?आपण जंगलावर अतिक्रमण केले आहे ती नष्ठ झाली आहेत, सिमेंटच्या जंगलामुळे प्राणी पक्षी नष्ठ झाली आहेत.
 
अहो आपण फक्त बोलायचे करायचे काहीच नाही, म्हणतात ना,बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले...!परंतू आज वंदन करावे असे पाऊले कुठे शोधून सापडत नाहीत..!
     
झाडे लावा, जीवन वाचवा राज्य सरकारने १ जुलै या एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता.तो नुसता whats app,T.V.पेपर वर चार दिवस जाहिरात फिरवली पण पुढे काय झाले विचारा स्व:ताला ..!              
असेल हिरवी सृष्टी
तर होइल निर्मळ वृष्टी ।
म्हणून झाडे लावा,झाडे जगवा
   
आपल्या पृथ्वीने आपल्याला काय काय दिले.झाडे,फुले,फळे,पाने,पाणी आणि जमीन.ह्या सगळ्यांमुळे आपण जगलो. झाडे आणि जमीन नसती तर आपल्याला अन्न मिळाले नसते.अन्न सोडा पण आपल्याकडे जमीन नसती तर आपण चालू शकलो नसतो.नद्या नसत्या तर आपल्याला पाणी मिळाले नसते.हवा नसती तर आपल्याला श्वास घेता आला नसता.हे सगळे पृथ्वीने आपल्याला दिले.पण माणसाला जे दिलं त्यापेक्षा अजून खूप हवे असते. झाडे दिली आहेत,मग कापा...घरात व इतर ठिकाणी फर्निचरसाठी लाकूड लागेलच. मी म्हणत नाही की झाडे अजिबात कापायची नाहीत आणि म्हटलं जरी असते तरी कोणी ऐकले असते का ?
     
अरे पण कापलेल्या जागी दुसरी झाडे तरी लावा..! माहित आहे ना की
       trees take in carbon- dioxide and breathe out oxygen which is good for humans?        
       
मग का नाही झाडे लावायची..?झाडाचे महत्व शिवाजी महाराज आपल्या आज्ञापत्रात सांगतात,रवींद्रनाथ टागोर शांतिनिकेतनची स्थापना वृक्षराशीत करतात..!
           
असे म्हणतात,कि माणूस सगळ्या प्राण्यांमधील सर्वात हुशार आहे.पण झाडे वाचवण्यात कुठे गेली त्याची हुशारी?झाड कापल्यानंतर साधे एक झाड लावता येत नाही त्या जागेवर?पण झाडे कापून,त्यांचे लाकूड विकून,पैसे मिळवायचे.किंवा दुसऱ्या पद्धतीने विचार करा,झाडाच्या बाजूने.झाड पण सजीव आहे.जसा आपल्याला तसा त्यांना नाही जगायचा हक्क?झाडे कापा,पण पुन्हा एक तरी लावा!
   
माणूस आणि प्राणी यांच्यात एक नात आहे मायेचे....प्रेम दिल्याने प्रेम वाढते  हे माणसांनी सिद्ध केले आहे. आपण अनेक सण साजरे करतो आणि आनंद  वाटतो. पण त्यातील खूप सण प्राणी आणि वनस्पतींवर अवलंबून असतात. ही वेगळी आणि खूप सुंदर परंपरा आपण  जपतो. यातून निसर्गाच्या जवळ जातो आणि निसर्गाचे आपण एक घटक  आहोत ही जाणीव करून घेतो.
   
या भूतलावर माणूस एकटे जीवन जगू शकत नाही. त्याला सहकारी आवश्यक असतो. आपल्या मनातील बोल ऐकणारा आपला सखा तो शोधात असतो. मग कधी माणसाच्या वेगवेगळ्या नात्यामधून तर कधी प्राणी आपलेसे करून तो शोध घेतो. माणसाच्या आतल्या माणसाला हे जग खूप आवडते. या जगातील प्रत्येकजण त्याला आपला वाटतो. आपले  सुखाचे आणि दुखः चे क्षण  वाटून घेण्यसाठी... पण जेव्हा माणस माणसाची साथ सोडतात...माणस माणसापासून दूर जातात ...आणि माणूस खऱ्या अर्थाने एकटा पडतो  तेव्हा माणसाला हा हिरवा निसर्ग,ही झाडे,ही वेली,हे पशु पक्षी जवळ करतो....का तर त्याच्या सारखा दुसरा सखा नाही..!
   
झाडे, प्राणी त्याच्यावर प्रेम करतात. आणि माणसाचा एकांतवास संपवतात. त्याला जगण्याची नवी प्रेरणा देतात.. आणि जगात असताना कसं जगावं  ते शिकवतात. आपण या जगात आलो तेव्हा पासून आपले सारे रक्षण हा निसर्ग करतो मुक्तहस्ताने .......! मग आपण आपला आनंद साजरा करतो तो ही निसर्गात..! आपल्यावर निसर्ग एवढी कृपा करत असताना आपण त्याच्या सर्व प्राण्यांवर प्रेम करायला पाहिजे. वृक्ष वेली आम्हा सोयरे वनचरे  म्हणणाऱ्या संत श्रेष्ठ तुकोबांच्या या भूमीत आपण निसर्गाशी एकरूप झाले पाहिजे....!
   
पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे...त्या अनुषंगाने सध्या सोशल मीडियावर तसे मेसेज येत आहेत. वाढते तापमान, कमालीचा उकाडा, पाण्याचे दुर्भिक्ष, पावसाची अनिश्चिती या सर्वाला आपणच जबाबदार आहोत.हो आपणच ...!
झाडे असतील तर आपण आहोत
ती नाहीत तर आपण हि नाही
झाडा शिवाय मोकळा श्वास हि नाही,
झाडा शिवाय निसर्गाला सौंदर्य नाही
झाडा शिवाय मनमोकळी हवा हि नाही
उन्हातून आल्यावर सावली देणारे झाडा
शिवाय प्रेमळ कोणी हि नाही
झाडे लावा झाडे जगवा
या शिवाय मी हि जास्त काही बोलणार नाही .....
जय हिंद..!जय महाराष्ट्र ..!
                                                       
श्री.संतोष भगवानराव तळेकर
                                              
जि.प.शाळा खानिव,ता.डहाणू,जि.पालघर                      
                                                         मो.  8275941474

No comments:

Post a Comment