“दिपस्तंभ तू वादळातला
चैतन्याचा निरंतर झरा,
उजळे अंधार मनामनातला
अन मोहरते ही धरा...
स्मृतीदिनी नतमस्तक माई आज मी तुझ्या चरा..!!”
भारत ही अनेक महापुरुषांची भूमी.. येथे अनेक रथी महारथी जन्मास आले त्यांनी या भूमीस एका उंचावर नेऊन ठेवण्याचे काम केले, पुरुषांबरोबर अनेक स्रीयांनीही या भारत देशाच्या नकाशात रंग भरवून नकाशा सुंदर बनवला..!त्या स्रीयांचा जीवन पट,जीवनाचा आलेख पहिला तर आपल्या लक्षात येते की त्यांचे संपूर्ण आयुष्य हे एका विधायक कार्यामध्ये झपाटलेले असते, समाजासाठी वेचलेले असते.यामध्ये अनेक महिलांनी आपले योगदान दिले,ज्यांच्या मुळे अनेक मुली शिकल्या,स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या,आकाश्यात उंच भरारी मारू लागल्या,आज त्याच एका स्री क्रांती युगाचा स्मृतीदिवस... ज्याकाळी चूल आणि मुल एवढ्या पुरतेच स्री चे अस्तित्व होते,त्याकाळात या फुले दापत्यांनी एक मानवतेचा लढा दिला..! त्याकाळी सावित्रीने आपल्या पती म्हणजे महात्मा ज्योतीराव फुले सोबत जीवनाचे धडे गिरवले, एक क्रांती केली,स्रीला गुलामगिरीतून मुक्त केले,स्री शिक्षणाचा पाया घातला,मुलींच्या शाळा काढल्या,समाजाला स्री शिक्षणाचे महत्व पटवून दिले.स्री शिक्षणाबरोबर अहोरात्र गोर गरीब-पीडितांची सेवा केली.
महात्मा फुलें यांच्या पत्नी म्हणून सावित्रीमाई परिचीत आहेत.मात्र,त्यांचे स्वतंत्र व्यक्तीमत्व होते.1890 साली महात्मा फुलेंच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाची धुरा खांद्यावर घेतली आणि सत्यशोधक विचारांचा प्रसार केला.त्यांनी महात्मा फुलेंच्या निधनानंतर त्यांचे कोणतेही काम अर्धवट सोडले नाही.त्यांच्या विचारांचा प्रसार त्यांनी साहित्यातूनही केला.
इ.स.1896-97 साली पुणे व परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला.हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला.हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला.यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीमाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला.त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या.प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीमाईंनाही प्लेग झाला.त्यातून 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले. अशा एका नारीयुगास माझ्या सावित्री माईस माझा मनाचा मुजरा..
जय जिजाऊ..!जय सावित्री ...!
शिवश्री संतोष तळेकर सर
जि.प.शाळा खानिव,केंद्र.कासा,ता.डहाणू,जि.पालघर
( 8275941474
No comments:
Post a Comment