भक्तीशक्ती

भक्तीशक्ती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत..!! .
web toolsHtml Codes

क्रांतीचा धगधगता एल्गार म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील..

      
               
    क्रांतीचा धगधगता एल्गार म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील..
             


            आज 3 ऑगस्ट एका वादळाचा जन्म दिवस..जे वादळ महाराष्ट्रात सतत घोंगावत राहिलं ते नुसतच वादळ नव्हते तर ती एक क्रांती होती..आणि क्रांती हा शब्द नुसता उच्चारला तरी समोर साक्षात असे व्यक्तिमत्व उभा राहते की क्रांती..क्रांतिकारक हा शब्दच केवळ त्या महामानवासाठी बनलाय की काय असा प्रश्न पडतो,छत्रपती शिवरायांना आदर्श मानुन इंग्रज सरकार विरोधात बंड करून,थंड करणारे स्वतंञ प्रतिसरकार स्थापन करणारे,इग्रजांना सळो की पळो करून सोडणारे महाराष्ट्राला एक वेगळ वळण देणारे, इंग्लंडमध्ये ब्रिटिश संसदेत प्रश्न विचारला गेला,"जगभरात ब्रिटिश सत्तेचा सूर्य मावळत नसतांना भारतातील शेकडो गावांत इंग्रज सरकारचा सूर्य का मावळला ? याचे उत्तर होते, सह्याद्रीचा ढाण्या वाघ आणि तो वाघ   म्हणजे 'क्रांतिसिंह नाना पाटील'.... !
   या सह्याद्रीच्या ढाण्या वाघाचा जन्म 3 ऑगस्ट १९०० रोजी सातारा जिल्ह्यात वाळवे तालुक्यात यडे मच्छिंद्र या खेड्यात झाला, नानांचे पूर्ण नाव नाना रामचंद्र पिसाळ होय.लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते.  पोशाख म्हणाल तर साधे सूती धोतर, सूती नेहरू शर्ट, धिप्पाड शरीरयष्टी आणि कर्तृत्व त्यामुळे  क्रांतीसिंह नाना पाटील हे नाव आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात विहार करत आहे. नाना पाटील यांना वाळवा गाव खूप आवडत असे, त्यामुळे ते वाळव्यातच असायचे.
   शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी  म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले.             १९३०च्या सविनय कायदेभंग चळवळी पासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते. महात्मा फुले यांचा सत्यशोधक वारसा क्रांतीसिंह नाना पाटील यांनी जपला तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा  कार्याचा प्रभाव त्यांच्यावर होता. त्यांनी 'गांधी -विवाह' ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले.. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्‍न केला. नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता.परंतू नाना अंधश्रद्धा मानणारे नव्हते ,ते आपल्या भाषणामधून अंधश्रद्धेवर प्रहार करत,तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून, त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोटी नानांकडे होती. आपल्या भाषणातून ते कायम देवाच्या दारी मध्यस्थांची गरज नसल्याचे मत मांडत. देवाला प्रार्थना करण्यासाठी पंडितांची गरज नसून स्वतः पूजाअर्चा आणि प्रार्थना करण्यावर जनसामान्यांनी भर द्यावा, असे ते सांगत. पंडितांना दक्षिणा देऊन विधी व प्रार्थना करणे अयोग्य असल्याचा प्रचार- प्रसार त्यांनी केला. आपण देवाशी सरळ बोलू शकतो. देवाला सर्व भाषा कळतात. तसेच देवाला आपला आवाजही कळतो असे ते सांगत. ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतिसिंहाचे प्रमुख योगदान होय.
      आपुला आपण करू कारभारहे सूत्र नानांनी प्रत्यक्ष अंमलात आणले आणि या जाणिवेतून ब्रिटिश सरकारला समांतर असे " प्रतिसरकार " क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केले.प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली.
     नाना प्रथम काँग्रेसमध्ये नंतर शेतकरी कामगार पक्षात व नंतर साम्यवादी पक्षात त्यांनी प्रवेश केला होता."शेतीमालाचे भाव जीवनावश्यक वस्तूंच्या भावाच्या समांतर हवेत.निवडनूकीत मांडलेला हा मुद्दा नानांची दूरदृष्टी दाखवून देणारा आहे...  संसदेत मराठीतून भाषण करणारे पहिले ते खासदार होते.१९५७/१९६२ च्या लोकसभा निवडनूकीत सातवी पास झालेला एक उमेदवार जनतेला लोकसभा निवडणूकीत लोकशाही,नियोजन आयोग,प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कररचना गावातील पार,झाडाखाली समजावून सांगायचा.क्रांतीसिंह नाना पाटील या विषयांवर लोकसभा निवडणूकांत भाषणे करत असतं.सातारा आणि बीड लोकसभा मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवलेली...आणि ते निवडून पण आले होते...लोकसभा निवडनूकीत वडा आणि चिकनसूपची आज चर्चा होताना १९५७/६२ ला हे विषय सभेतून मांडणारे नाना ग्रेटच ठरतात..नागनाथ आण्णा,जी डी बापू,पांडू मास्तर,वसंतदादा,यशवंतराव चव्हाण हे त्यांचे सहकारी नंतर ही महाराष्ट्रात राजकीय जीवनात व सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणारे ठरले..नेतृत्वाची ही फळी उभारली ती...नानांच्या विचारातूनच...!
स्वातंत्र्यसंग्रामाची धगधगती मशाल म्हणून इतिहासाने ज्यांचा गौरव केला केला,हातात बेड्या असताना कृष्णेच्या पात्रात 250 फूटावरून उडी मारणारे कुठल्याही प्रकारचा माफीनामा न लिहून देता. मरेपर्यंत इंग्रज सरकारला न सापडलेले खरे स्वातंत्र्यवीर क्रांतीसिंह नाना पाटील होय..!! अशा या क्रांतिसिंहांचे ६ डिसेंबर इ.स.१९७६  वाळवा मध्ये निधन झाले....
   ..........बुलंद क्रांतीविरास आद्य स्वातंत्र्यविरास जयंतीदिनी माझा मनाचा मुजरा...

  pdf साठी  DOWNLOAD येथे क्लिक करा 
     

श्री.संतोष भगवान तळेकर
प्रा.शिक्षक
जि.प.शाळा खानिव,केंद्र.कासा,ता.डहाणू,जि.पालघर,
8275941474

No comments:

Post a Comment