भक्तीशक्ती

भक्तीशक्ती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत..!! .
web toolsHtml Codes

बाळकडू

                                                                        बाळकडू.. 
               मुल म्हणजे आपला श्वास...मुल म्हणजे आपल विश्व..मुल म्हणजे म्हातारपणीची काठी..अजून काही काही..खरे आहे मुल मुलं मुलच असतात..!
        "जन्माला येणारं प्रत्येक मूल हाच संदेश घेऊन येतं की परमेश्वर अजून तरी माणसावर रुसलेला नाही. मूल म्हणजे माणसाला मिळालेली सर्वात सुंदर देणगी," असं रवींद्रनाथ टागोर म्हणतात.
           मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं आपण म्हणतो, पण ही फुलं फुलत असताना आपली भूमिका आपलेपणाने बागेची देखभाल करणार्‍या माळ्याची आहे की रखवालदाराची हे तपासून पाहणे गरजेचे आहे. आपली मुलं फक्त आपलीच नसतात, तर ती राष्ट्राची संपत्ती असतात. त्यांच्याच विश्वासावर देश आर्थिक, सांपत्तिक, सांस्कृतिक, वैचारिक प्रगतीचे स्वप्न पाहत असतो. म्हणून त्यांना जाणीवपूर्वक घडवायला हवे.                
   खर तर मुलाचा जन्म होण्याच्या आधीपासूनच आपण एका वेगळ्या विश्वात वावरत असतो..वेगवेगळी स्वप्न पाहत असतो...!मुलगा असो वा मुलगी दोन्ही सारखेच...पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचे तिन्ही लोकी झेंडा..!
तुकोबाराय सांगतात 'कुळी कन्या पुत्र होतीजे सात्विक ..'
           आपलं बाळ सशक्त,निरोगी आणि सुंदर असावं,असं प्रत्येक आईला वाटतं.त्याला चांगला पौष्टिक आहार मिळावा,त्याची निकोप वाढ व्हावी,याची ती काळजी घेते.त्याला छान छान कपडे आणि खेळणी देऊन ती त्याचे लाड पुरवते.आपलं मूल शिकून मोठं व्हावं,त्यानं नावलौकिक मिळवावा आणि सुखी व्हावं म्हणून आई वडील  बाळासाठी खस्ता खातात ,संसारातले कष्ट आनंदानं झेलतात.आई अंगाई म्हणून त्याचे कोड कौतुक करून सुसंस्कार घडवत असते, "दहा गुरूंपेक्षा एक आचार्य श्रेष्ठ,शंभर आचार्यांपेक्षा एक पिता श्रेष्ठ आणि हजार पित्यांपेक्षाही एक आई श्रेष्ठ",असं एक संस्कृत सुभाषित आहे.    
अंगणात दाणे टिपता टिपता पिल्ल परिसरात,मित्रात,समाजात पाऊल टाकायला लागतात.त्यांच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावतात.मुल हे अनुकरणीय असतात,ते लगेच आपल्या बुद्धीच्या जोरावर तर्क वितर्क लावतात.शालेय परिसरात ते बेफान होते तेथे त्याच्या आयुष्यावर पैलू पडायला सुरुवात होते,खेळण-बागडण गाणी गप्पा यात ते हरवून जाते,अभ्यासाची गोडी मुलांना शिक्षक लावतात.        
        आपल्या मुलास ‘सुसंगती सदा घडो’ एवढेच माहीत असणे योग्य नाही. पालकांनी मुलांच्या संगतीच्या बाबत सदैव जागरूक असायला हवे. कारण 'ढेकणाचे संगे हिरा जो भंगला ..असे व्हायला नको.मुलांचे सारे मित्र-मैत्रिणी आपल्या चांगल्याच परिचयाचे असावे. मुलांचे मित्र हे आपले मित्र होऊ शकतात. पण त्यासाठी त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये बंध निर्माण व्हावे लागतात, नव्हे करावे लागतात. ह्याचा फायदा आपल्या मुलांना होतो. आपल्याला त्यांची काळजी लागत नाही. हसत खेळत, बुद्धीला ताण न देता मुले ज्ञान मिळवतात. समाजात मिळून मिसळून राहतात.
     ' आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया 'त्यासाठी पालकांनी जागरूक असावे, ‘सुसंगती सदा घडो’ तसे ‘सुसंधी सदा मिळो’ अशी आपण परमेश्‍वराची प्रार्थना करावी. आपल्या जीवनात आलेल्या संधीचा चांगला उपयोग करून घ्यावा. तसी संधी निर्माण करणे हे निश्‍चितच वैयक्तिक कौशल्य आहे. हे त्यांचे कौशल्य स्पर्धात्मक परीक्षांतून दिसून येते. स्कॉलरशिपच्या परीक्षा त्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. ह्या परीक्षांना बसण्यासाठी शिक्षक व पालकांनी तयारी करून घेतली पाहिजे. मुलांचे छंद जोपासावेत. ज्याला वेगळे काही मिळवायचे आहे त्याला वेगळे करावेच लागते. आई-वडिलांचे न ऐकणे म्हणजे स्मार्ट बनणे नाही. कुठल्याही प्रश्‍नाचे उत्तर लगेच, अचूक देता येणे, हा खरा स्मार्टनेस आहे. आई-वडिलांचे ऐकल्याचे फळही अमोल. शिक्षकांच्या आशीर्वादाने मुलांचे कल्याण होते.    
      अस म्हणतात,  मुलांचे पाय पाळण्यात दिसतात. शालेय जीवनात मुलांच्या बुद्धीची कुवत, त्याची प्रत पालकांनी जाणून घ्यायला हवी. आपल्याला आपले मूल जोखता आले पाहिजे. त्यासाठी आपण सक्षम असले पाहिजे. आपण काही पूर्वग्रह ठेवता कामा नये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण त्यात रस घेतला पाहिजे.
पोषक वातावरण मुलांना प्रसन्न, ताजे टवटवीत ठेवते. घरात आणि शाळेत शैक्षणिक वातावरण जाचक कधीच असू नये. खेळीमेळीचे वातावरण असल्यास मुलांना त्यांचा फायदा होतो. मुलांचे वय धूसर धुक्यासारखे असते.ना आपल्याला ते नीट दिसत, ना मुलांना काही बाहेरचे दिसत. यालाच आपण आपल्या भाषेत ‘अजून लहान आहे, विशेष समजत नाही…’ असे म्हणतो. पण त्या धुक्यामध्ये सुद्धा तो ‘असतो’ हे विसरता कामा नये. या वयामध्ये जर आपण मुलांकडे जागरूकपणे नीट लक्ष पुरवले नाही, तर ‘धुक्यात हरवलेली वाट’ असे काहीसे होते. अशावेळी शिक्षकांनी मुलांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेले पाहिजे.
आपण स्वतः कृती करून मुलांना शिकवतात. मुलांनी योगासने करावीत म्हणून स्वतः योगासने शिकतात. एक चांगला पालक मुलांची आई, शिक्षक व मार्गदर्शक बनतो, तर शिक्षक त्यांचे तत्वज्ञानी व चांगले गुरू! कधीकधी पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष होते. पालक मुलांना शाळेत टाकतात. पोटार्थी शिक्षक, निद्रिस्त पालक व नकोसा झालेला विद्यार्थी ही आजच्या शिक्षणव्यवस्थेची शोकांतिका आहे. मुलांना आई-वडील असतात, पण पालक नसतात. प्रत्येकाने मुलांचे केवळ आई-वडील न होता, मुलांचे खर्‍या अर्थाने पालक बनले पाहिजे, चुकून काही गोष्ट घडली तर त्याला समजून सांगा सौम्य शिक्षा करा,आई वडिलात एक वाक्यता ठेवा.
        समाजात कसे वावरावे याचेही धडे त्याच्याकडून गिरवून घ्या, कोणतीही गोष्ट सहज मिळत नसते, यश हे केवळ बुद्धिमत्तेचे नसून, त्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता असते. यासाठी पालकांनी मजबूत पाया घातला पाहिजे आणि शिक्षकांनी कळस चढविला पाहिजे. म्हणतात ना, ‘आधी कळस मग पाया’. यश केवळ योगायोगाचा भाग नसून ते नियोजनाचे व परिश्रमाचे फळ असते. ज्यावेळी सह अध्यायी झोपलेले असतात त्यावेळी रात्र रात्र जागवून यश मिळालेले असते,कारण विजेत्या वेगळ्या गोष्टी करत नाही तर ते प्रत्येक गोष्ट वेगळ्याप्रमाणे करतात, रोम  शहर एका दिवसात बांधून झाले नाही, ही म्हण आठवते ना? मुलांच्या कर्तबगारीचे संगमरवरी शिल्प उभे करायला आपल्या तारुण्याचे काही पत्थर त्यात पाया म्हणून घालावे लागतात. आपल्या शंका, कुशंंका, पालकांना व शिक्षकांना सांगाव्यात. शंकांचे समाधान करून घ्यावे. हिरव्या कच्च्या फळांना पिकावे लागते. मुलांनी अनुभव घ्यावा लागतो. प्रयत्न करावे लागतात. म्हणतात ना प्रयत्ना अंती परमेश्‍वर.
विश्वास नांगरे पाटील यांनी अनुवादित केलेली कविता आपणास माहित आहेच,जे अशक्य वाटतय
ते स्वप्न मला पहाचय...!
ज्या शञुचा कोणी पराभव करु शकत नाही
त्याला मला हरवाचय...!

कोणालाही सहन होत नाही अस दुःख मला सहन कराचय...!
ज्या ठिकाणी धाडसी माणस जाण्यास धाडस करत नाही
त्या ठिकाणी मला जाऊन धावाचय...!

ज्या वेळी माझे भाऊ थकलेत

पाय थकलेत, हात थकलेत,
शरीर थकलय, त्या वेळेस मला,

समोर मला " एव्हरेस्ट " दिसतय त्या वेळी मला माझे 
एक एक पाऊल त्या " एव्हरेस्ट " च्या दिशेने टाकाचय...!
तो " स्टार " मला गाठाचाय मला " सत्यासाठी " झगडाचय सर्घष कराचाय..
कुठलाही प्रश्न त्यासाठी विचरायचा नाही
थांबा घ्यायचा नाही...!

माझी नरकात जायची  सुद्धा तयारी आहे पण
त्याला कारण " स्वर्गीय "
असल पाहिजे...! 
   या कवितेचा अर्थ त्यांना सांगा,
                     मुल किशोर वयात वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता असते तेव्हा जरा जागरूक रहा,त्याला चांगले काय वाईट काय हे समजून सांगा,मौज मजा करायला पुढील सर्व आयुष्य पडलंय हे त्याला सांगा.
  एकदा का मुल आपल्या पायावर उभे राहिले की आई वडिलाना समाधान वाटते,त्याचे दोनाचे चार हात  करावेत परंतु करताना त्यांना विश्वासात घेणे महत्वाचे असते,संसाराचे काही अनुभव सांगा त्यांना ..त्यांच्या संसारावर जास्त लक्ष देऊ नका,म्हणजे त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका,
पैसा खूप कमवा परंतु त्या सोबत संस्कार कमवा ,आपल्या मुलाची लायकी सुधारा,संततीसाठी संपत्ती कमवण्यापेक्षा संपती मिळवणारी  संतती तयार करा , कोणताही देश सोन्याचांदीमुळे महान नाही होत. ज्या देशाची मुले महान असतील, तोच देश हा महान होय. त्यालाच चांगले भवितव्य असते, असे जे कोणी म्हणून ठेवले आहेत ते योग्य आहे. राष्ट्राची संपत्‍ती म्हणजे मुले आहेत. ती भावी भारताचे आधारस्तंभ  आहेत. कर्णधार आहेत.....!!

      शेवटी एवढेच.....
                             अशी घ्या गगन भरारी
                            की खुजे राहील आकाश
                             इतके प्रकाशमान व्हा
                       की सूर्यही मागेल प्रकाश...!






                                                              माझ्या पिढीचा ताळेबंद

-विक्रम गोखले
अंकः मे २००८
                    एका आत्ममग्न पिढीचा प्रतिनिधी म्हणून मी या लेखातून आपल्याबरोबर संवाद साधणार आहे. माझी पिढी म्हणजे जी आज साठीच्या उंबरठ्यावर उभी आहे ती. माझ्या लहानपणाच्या आठवणीप्रमाणं माणूस साठ वर्षांचा झाला की त्याच्या आयुष्याची इतिश्री झाली असं मानलं जायचं. त्याने जिथं नोकरी केली असेल तिथं शाल आणि श्रीफळ देऊन निरोप समारंभ व्हायचा. घरी एकसष्टीची तयारी व्हायची. त्यानंतर सहकुटुंब तीर्थयात्रेला जायचं नाहीतर
कोपऱ्यात ‘हरी हरी’ करत बरायचं. ‘द एंड’ची पाटी येईपर्यंत सिनेमा पहावा तसं मृत्यूचं आमंत्रण येईपर्यंत जगत रहायचं. पण आता तसं उरलेलं नाही. साठीनंतरही आयुष्याचा खूप मोठा काळ हाती असतो. वैद्यकीय सुविधांमुळं शरीर बऱ्या पैकी साथ देत असतं. मुख्य म्हणजे अजूनही काही करण्याची आणि मनापासून जगण्याची उमेद मनात शिल्लक असते. ही उमेद एखाद्या तरुणासारखी असली, तरी चेहऱ्या वरच्या वयाच्या खुणा मात्र लपत नाहीत. कार्यक्रमांमध्ये आपला परिचय करून देताना नावामागं ‘ज्येष्ठ’ असा उल्लेख हमखास केला जातो. पण खरं सांगतो, तरीही वय झाल्यासारखं वाटत नाही. माझ्यापुरतं सांगायचं, तर वय झालं असं वाटण्यासारखी एकच बाब मला तीव्रतेनं जाणवते. ती म्हणजे मला आजच्या तरुण पिढीकडं पाहताना, विशी-बाविशीतल्या मुलांकडं पाहताना काळजी वाटायला लागते. अनेकदा त्यांचे आपापसातले संवाद ऐकताना ‘काय ही आजकालची पिढी’ असा विचार नकळत मनात येतो. मग मात्र जाणवतं, की येस, रुढार्थानं आपलं आता वय झालं आहे.

हो, मला माहिती आहे की, अडीच हजार वर्षांपूर्वी सॉक्रेटिसनंही म्हणून ठेवलंय की, आजकालची पिढी खूप बिघडली आहे. त्यानंतरच्या सर्व पिढ्या आपल्या पुढच्या
पिढ्यांविषयी तेच म्हणत आहेत. पण माफ करा. माझं म्हणणं त्या प्रकारातलं नाही. एकतर माझा माणसांच्या घडण्याच्या आणि बिघडण्याच्या कल्पना सनातनी माणसासारख्या नाहीत. मी आपल्या भोवतीच्या जगाशी, जगात घडणार्या बदलांशी सतत जोडून घेण्याचा प्रयत्न करत असतो. मी माझ्या जुन्या मित्रांशी जशा छान गप्पा मारतो तशा माझ्या अवतीभवती असणार्या तरुण मुलामुलींशीही मारू शकतो. वयातलं अंतर हा माझ्यासाठी अडसर ठरत नाही. पण मग तरीही आजकालच्या पिढीविषयी मला जी काळजी वाटते तिच्यामागचं कारण काय असेल?
  आजकालच्या मुलामुलींचे चित्रविचित्र, तोकडे कपडे घालणं किंवा चारचौघात कसं वागावं याची रीत नसणं यासारख्या गोष्टींवर अनेकदा आक्षेप घेतले जातात. पण माझं म्हणणं इतकं वरवरचं नाही. अधिक नेमकं सांगायचं तर या मुलांच्या वागण्यापेक्षा विचार करण्याच्या पद्धतीवर माझा आक्षेप आहे. आपण ज्या जगात राहतो त्या जगाचं समतोल भान यांना का नाही हा प्रश्न मला छळतो. आपलं आता कोणावाचून अडणार नाही, या धुंदीमध्ये बाकी सगळ्याचाच कसा विसर पडू शकतो हे मला समजत नाही. आजच्या पिढीविषयीची निरीक्षणं मनात नोंदवत असताना, तिच्याविषयी काही मतं पक्की करत असताना साहजिकच माझ्या पिढीशी तुलना सुरू होते. माझी पिढी जेव्हा तरुण होती, तेव्हा ती आजच्यापेक्षा वेगळी होती म्हणजे नेमकी कशी होती, असा विचार चाळवतो. आजपासून बरोबर चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे १९६८ सालाच्या सुमारास आम्ही ऐन विशीत होतो. त्या काळी पुणं हे कनिष्ठ मध्यमवर्गीयांचं शहर होतं. आमच्या सगळ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची किंवा बेताची होती. मी स्वत: तर शाळेत असल्यापासूनच दारिद्र्याचे चटके सोसले आहेत.
माझी आई आणि वडील या दोघांचंही रुढार्थानं शिक्षण झालेलं नव्हतं. मला त्यामुळेच शिकायची इच्छा होती. पण त्यापेक्षा प्रबळ भावना होती ती लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभं राहण्याची, पैसे मिळवून आई-वडिलांना दारिद्र्यातून बाहेर काढण्याची. पुढं फर्ग्युसनमध्ये मी बी.ए.ला प्रवेश घेतला होता. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र असे तीन विषय होते; पण मी ते पूर्ण करू शकलो नाही. त्या शिक्षणासाठी घरून पैसे मिळणं शक्य नव्हतं. मी घरोघरी पेपर टाकून, लोकांचे डबे पोहोचवून, परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना वर्गात पाणी देऊन पैसे मिळवत होतो. पण तरीही पोटाच्या खळगीचं काय करणार, हा प्रश्न सुटत नव्हता. शिकायची भले कितीही इच्छा असली, तरी समोर नोकरी मिळण्याच्या काहीच शक्यता नव्हत्या. बी.ए. आणि एम.ए. पूर्ण करुन गरवारेच्या सायकल स्टँडची राखण करणारे तरुण मी डोळ्यांनी बघत होतो. शिक्षण पूर्ण करून, नोकरी मिळवून मग स्थिरस्थावर होण्याएवढा अवसर परिस्थितीनं आम्हाला दिला नव्हता. कारण कसलीच शाश्वती नव्हती. बेरोजगारीचा प्रश्न समोर इतका उग्र होता, की नोकरी मिळवणं हे गढूळ पाण्यामध्ये मासा शोधण्याइतकं व्यर्थ होतं.
माझी किंवा फक्त माझ्या कुटुंबाची ही स्थिती असती तर प्रश्न खूपच वेगळा होता. पण दुर्दैवानं त्या काळच्या समाजाचं हे प्रातिनिधिक चित्र होतं. माझ्या वयाची जी मुलं मी बघत होतो, त्या सगळ्यांची थोड्याफार फरकानं अशीच स्थिती होती. आमच्या आधीची पिढी आधी स्वातंत्र्यचळवळीत आणि नंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तावून-सुलाखून निघालेली होती. त्यांच्या तरुणपणी त्यांना व्यापक सामाजिक ध्येय होतं, आणि ते गाठण्यासाठी जे जे करणं आवश्यक होतं ते त्यांनी केलंही होतं. आमच्या समोर मात्र असं काही दिसत नव्हतं. अगदी दोन-पाच टक्के मुलं सोडली तर कोणाच्याही पुढं जगण्यासाठी काही उद्दिष्ट नव्हतं. आपण डॉक्टर व्हायचंय, का इंजिनिअर, का नट, का शिपाई, का अजून काही? कसलीच स्पष्टता नाही. अगदी करिअर करायचं, तरी फारसे पर्याय समोर नव्हते. स्वत:पलीकडे पाहिलं पाहिजे, असा विचारच डोक्यात नव्हता. अगदी आपल्या पायापुढचं पाहायचं, इतका संकुचित विचार होता. कुठून तरी चार पैसे मिळवायचे आणि रांगेला लागायचं, इतकीच मर्यादित आकांक्षा होती. आज मागं वळून पाहताना मला असं वाटतं, की अत्यंत निराश आणि हतोत्साही अशी ही पिढी होती.
आता, आपली इतकी दारूण अवस्था का झाली, याचा विचार करण्याएवढाही अवसर नव्हता. आपलं अस्तित्त्व टिकेल की नाही किंवा आपल्या भवितव्याचं काय होईल, याविषयी कमालीचं धास्तावलेपण मनात होतं. सहसा अशी अवस्था आली की जबाबदारीचं ओझं आपल्या आधीच्या पिढीवर टाकण्याची पद्धत असते. आम्ही मात्र तसं केलं असं मला वाटत नाही. यामागं परिस्थितीचा फार वस्तुनिष्ठ विचार केला होता असं अजिबात नाही. पण आपले वडीलधारे किंवा पालक यांच्याविषयी अनादर दाखवू नये, असे परंपरेनं आलेले संस्कार होते म्हणून.
त्या काळातल्या नेत्यांचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा एक नेहरू सोडले तर खूप व्यापक आणि दूरगामी विचार करू शकणारे नेते कमी होते असं दिसतं. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं, तर यशवंतराव चव्हाणांचा प्रभाव खूप होता. त्यांचा कल हा मुख्यत: बहुजनांचा विकास साधण्यावर होता, आणि तो योग्यच होता असं मला वाटतं. त्या काळात मी यशवंतराव चव्हाण, आचार्य अत्रे, रामभाऊ म्हाळगी अशांसारख्या अनेकांची भाषणं आवर्जून ऐकत असे; पण ती ऐकून त्यावर काही विचार करावा असं मनात येत नव्हतं. त्यांच्या विचारांच्या सुपरिणामांची किंवा दुष्परिणामांची चर्चा करणं, हा अजून पुढचा भाग झाला. कारण आपले पोटाचे प्रश्न सुटले की जगातले सगळे प्रश्न सुटतील, असं मलाच नाही, पण आमच्या पिढीच्या अनेकांना वाटत होतं. राजकीय आणि सामाजिक जाणीव आमच्यात तयार झाली, पण ती खूप उशिरा. तोपर्यंत वयाची विशी मागं पडली होती आणि आमच्यातल्या प्रत्येकाचा जगण्याचा प्रवास सुरू झाला होता.
त्यानंतरचा म्हणजे १९७५च्या सुमाराचा काळ हा अगदीच वेगळा होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर बर्याच वर्षांनी महाराष्ट्रात सामाजिक चळवळींनी जोर धरला. दलित पँथर, युवक क्रांती दल, लोक बिरादरी, स्त्रीमुक्ती चळवळ अशा किती तरी चळवळी जोमानं वाढत होत्या. त्याच दरम्यान जयप्रकाश नारायणांचं देशव्यापी आंदोलन सुरू झालं. त्यालाही महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद लाभला. मुख्य म्हणजे आम्ही नाटकवालेसुद्धा त्या काळात वेगळ्या प्रकारचं नाटक करू लागलो. नेहमीच्या कौटुंबिक विषयांच्या चौकटीतून बाहेर पडून एक समांतर प्रवाह तयार झाला. मी स्वत: त्यामध्ये सक्रीय होतो. समाजातला एक गट सर्व प्रकारच्या सामाजिक चळवळींमध्ये ओढला गेला होता. बाकीचे अप्रत्यक्षपणे संबंधित होते. पण एक संपूर्ण पिढी म्हणून किती टक्के लोकांमध्ये पक्की व्यापक सामाजिक जाणीव होती, हे सांगणं जरा कठीण आहे. कारण बहुतेकजणांचा या घडामोडींशी येणारा संबंध हा वर्तमानपत्रांत बातम्या वाचण्यापुरताच होता. त्या वाचाव्यात आणि वाटलं तर त्यावर थोडी चर्चा करावी किंवा थेट दुर्लक्षच करावं, असा फील माझ्यासार‘याला तरी येत होता.
१९८०च्या दशकानंतर आमच्या पिढीवर एक नवीन जबाबदारी आली. आम्ही स्वत:च आता पालक झालो. आमच्या मुलांची पिढी घडवण्याची आमच्यावर आलेली ही नवी जबाबदारी होती. आजची मुलं म्हणजे उद्याचे नागरिक असतात किंवा मुलं म्हणजे राष्ट्राचे खरे आधारस्तंभ, वगैरे उदात्त वाक्यं आम्ही जाता-येता म्हणत होतो किंवा ऐकत तरी होतो; पण प्रत्यक्षात मात्र स्वत:च्या मुलाला आपण चांगला नागरिक बनवतो आहोत की पैसे कमावणारा करिअरिस्ट बनवतो आहोत याचं भान मात्र आम्हाला नव्हतं. आमच्या लहान वयात आम्ही उपासमारीचे आणि  दारिद्र्याचे चटके सहन केलेले होते. ते मात्र या मुलांच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून आम्ही परोपरीनं धडपडत होतो. मुलांना खाऊ, खेळणी, पुस्तकं आणताना पैशाचा विचार करत नव्हतो. त्यांनी खूप शिकावं, खूप अभ्यास करावा म्हणून जमेल ती खटपट करत होतो. त्यांनी मोठेपणी मानानं आणि मजेत जगावं, असं स्वप्न उराशी बाळगून होतो. तळहातावरचा फोड जपावा, त्याला कुरवाळावं तशी आमच्या पुढची पिढी आम्ही लाडाकोडात वाढवली. आपल्या लहानपणी जे सुखी बालपण आपल्याला मिळालं नाही ते पुढच्या पिढीला देण्यात धन्यता मानली.
तर अशी ही आमच्या पुढची पिढी आज विशी-पंचविशीमध्ये आहे. आम्ही विशीमध्ये असतानाचा काळ आणि आताचा काळ यामध्ये खूप मोठं अंतर आहे. त्या काळी अगदी पुण्यासारख्या शहरातही अनेक गोष्टींची टंचाई होती. ज्याला मध्यमवर्ग म्हणतात तोही बè`m पैकी विपन्न अवस्थेत होता. आता मात्र या वर्गाला टंचाई हा शब्द ठाऊक नाही. स्वत:चे फ्लॅटस् चारचाकी गाड्या, फार्म हाऊसेस, परदेश दौरे, मोबाइल फोन्स, लॅपटॉप्स अशा किती तरी संपन्न खुणा या मध्यमवर्गाभोवती आज दिसतात. १९९० नंतरच्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत भारतात खूप मोठ्या प्रमाणात पैसा आला. आयटीच्या लाटेबरोबर प्रचंड पगाराच्या नोकè`m आल्या. आमची ही आजची तरुण पिढी ग्रीन कार्ड घेऊन अमेरिकेत तरी स्थिरावली आहे किंवा इथं भारतात लाखो रुपयांची पॅकेजेस दर महिन्याला मिळवते आहे. जी पिढी घडवण्याची जबाबदारी आपल्यावर होती ती आज मजेत जगते आहे, हे पाहून माझ्या वयाच्या अनेकांच्या डोळ्यांचं पारणं फिटतं आहे, स्वत:ला कृतकृत्य वाटतं आहे. पण... हा ‘पण’ खूपच महत्त्वाचा आहे.
एका गोष्टीचं मला खूप समाधान आहे, की ही पिढी खूप सावध आहे. कॉलेजच्याच काय, पण अगदी आठवी-नववीच्या मुलांनाही हे पक्कं ठाऊक असतं, की मी पुढं जाऊन कोण होणार आहे. करिअरच्या इतक्या प्रचंड संधी सध्या उपलब्ध आहेत; पण त्यामुळे ही मुलं गोंधळून जात नाहीत. त्यांचं ध्येयं अगदी पक्कं असतं. कोणती शाखा निवडायची, कोणतं शिक्षण घ्यायचं, भारतात राहायचं की परदेशात, कुठं नोकरी केली तर जास्त पैसे मिळतील, कोणती नोकरी स्वीकारायची, ती नोकरी कधी सोडायची, या सगळ्याचं नेमकं भान त्यांचं त्यांना असतं. त्यांच्या पालकांना म्हणजे आम्हाला त्यातलं फारसं कळतही नाही, आणि ते आमची फार ढवळाढवळ खपवूनही घेत नाहीत. आर्थिकदृष्ट्याही स्वत:ची काळजी आयुष्यभर व्यवस्थितपणे घेतील याविषयी शंकाच नाही, पण...
पण इतकंच आहे, की पैसा म्हणजेच आयुष्यात सगळं काही नाही, हे मात्र या पिढीला माहिती नाही. स्वत:च्या पलीकडं जाऊन आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचाही विचार केला पाहिजे, हे त्यांच्या गावीही नाही. इंटरनेटमुळे आपल्या बोटांच्या तालावर जग जिंकू पाहणारी ही मुलं ज्या गावात राहतात त्या समाजापासून मात्र पूर्णपणे तुटलेली आहेत. त्यांना जो प्रचंड पैसा मिळतो तो केवळ त्यांच्या कर्तबगारीमुळं नसून त्याला इतरही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कारणं आहेत, हे समजावून घेण्याची त्यांना गरज वाटत नाही. त्या पैशामुळं त्यांच्या डोळ्यांपुढं एक दाट धुकं पसरलेलं आहे. त्यामुळे ज्या शहरात आपण राहतो तिथून पन्नास किलोमीटरवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तिथं लोकांना उपासमारीमध्ये दिवस काढावे लागत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत, कोवळी मुलं कुपोषित होत आहेत, या प्रखर वास्तवाशी त्यांचं काही देणं-घेणं उरलेलं नाही. नाती म्हणजे काय, समानता म्हणजे काय, सर्वांगीण विकास म्हणजे काय, मूल्यं म्हणजे काय, ती का जपायची असतात, आपला देश म्हणजे काय, या कशाशीच त्यांचा संबंध दिसत नाही. ही सगळी परिस्थिती पाहून मी खूप व्यथित होतो. हे सगळं वर्णन आजच्या पिढीच्या प्रत्येक मुलाला किंवा मुलीला लागू पडणार नाही हे मला ठाऊक आहे. या सगळ्याला अपवाद ठरतील अशी मुलं-मुलीही आहेतच, पण ती अपवादानंच. पण एक पिढी म्हणून कोणीही डोळसपणे पाहिलं तर मी वर्णन केलेल्या खुणा निश्चितपणे दिसतील.
आता प्रश्न एकच उरतो : या पिढीच्या या अवस्थेला जबाबदार कोण? मी स्वत: त्या मुलांना संपूर्ण दोष द्यायला तयार नाही. कारण त्यांच्यापेक्षा अधिक दोष आमच्या पिढीकडं येतो, असं मला वाटतं. कारण त्यांना घडवण्याची संपूर्ण जबाबदारी आमच्यावर होती. त्यांना स्वत:च्या पायावर उभं करण्याच्या नादामध्ये चांगले नागरिक घडवण्याचं मात्र आमच्याकडून राहूनच गेलं. आमच्या आधीच्या पिढीनं आम्हाला दिलेली नीतिमूल्यं आम्ही आयुष्यभर जपली; पण मधल्या काळात ती कुठं तरी हरवली, असं आता या पिढीकडं पाहताना लक्षात येतं. आमच्या आधीच्या पिढीनं अतिशय दारिद्र्यात दिवस काढले; पण आम्हाला घडवताना त्यांनी चांगली मूल्यं, चांगले संस्कार आमच्यामध्ये खोलवर रुजवले. आम्ही लहानपणी गरिबी पाहिली असली, तरी नंतर पैसाही मिळवला आणि उपभोगलासुद्धा.             उपासमारीचे आणि दारिद्र्याचे चटके सहन केलेले होते. ते मात्र या मुलांच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून आम्ही परोपरीनं धडपडत होतो. मुलांना खाऊ, खेळणी, पुस्तकं आणताना पैशाचा विचार करत नव्हतो. त्यांनी खूप शिकावं, खूप अभ्यास करावा म्हणून जमेल ती खटपट करत होतो. त्यांनी मोठेपणी मानानं आणि मजेत जगावं, असं स्वप्न उराशी बाळगून होतो. तळहातावरचा फोड जपावा, त्याला कुरवाळावं तशी आमच्या पुढची पिढी आम्ही लाडाकोडात वाढवली. आपल्या लहानपणी जे सुखी बालपण आपल्याला मिळालं नाही ते पुढच्या पिढीला देण्यात धन्यता मानली.
तर अशी ही आमच्या पुढची पिढी आज विशी-पंचविशीमध्ये आहे. आम्ही विशीमध्ये असतानाचा काळ आणि आताचा काळ यामध्ये खूप मोठं अंतर आहे. त्या काळी अगदी पुण्यासारख्या शहरातही अनेक गोष्टींची टंचाई होती. ज्याला मध्यमवर्ग म्हणतात तोही बè`m पैकी विपन्न अवस्थेत होता. आता मात्र या वर्गाला टंचाई हा शब्द ठाऊक नाही. स्वत:चे फ्लॅटस् चारचाकी गाड्या, फार्म हाऊसेस, परदेश दौरे, मोबाइल फोन्स, लॅपटॉप्स अशा किती तरी संपन्न खुणा या मध्यमवर्गाभोवती आज दिसतात. १९९० नंतरच्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत भारतात खूप मोठ्या प्रमाणात पैसा आला. आयटीच्या लाटेबरोबर प्रचंड पगाराच्या नोकè`m आल्या. आमची ही आजची तरुण पिढी ग्रीन कार्ड घेऊन अमेरिकेत तरी स्थिरावली आहे किंवा इथं भारतात लाखो रुपयांची पॅकेजेस दर महिन्याला मिळवते आहे. जी पिढी घडवण्याची जबाबदारी आपल्यावर होती ती आज मजेत जगते आहे, हे पाहून माझ्या वयाच्या अनेकांच्या डोळ्यांचं पारणं फिटतं आहे, स्वत:ला कृतकृत्य वाटतं आहे. पण... हा ‘पण’ खूपच महत्त्वाचा आहे.
एका गोष्टीचं मला खूप समाधान आहे, की ही पिढी खूप सावध आहे. कॉलेजच्याच काय, पण अगदी आठवी-नववीच्या मुलांनाही हे पक्कं ठाऊक असतं, की मी पुढं जाऊन कोण होणार आहे. करिअरच्या इतक्या प्रचंड संधी सध्या उपलब्ध आहेत; पण त्यामुळे ही मुलं गोंधळून जात नाहीत. त्यांचं ध्येयं अगदी पक्कं असतं. कोणती शाखा निवडायची, कोणतं शिक्षण घ्यायचं, भारतात राहायचं की परदेशात, कुठं नोकरी केली तर जास्त पैसे मिळतील, कोणती नोकरी स्वीकारायची, ती नोकरी कधी सोडायची, या सगळ्याचं नेमकं भान त्यांचं त्यांना असतं. त्यांच्या पालकांना म्हणजे आम्हाला त्यातलं फारसं कळतही नाही, आणि ते आमची फार ढवळाढवळ खपवूनही घेत नाहीत. आर्थिकदृष्ट्याही स्वत:ची काळजी आयुष्यभर व्यवस्थितपणे घेतील याविषयी शंकाच नाही, पण...
पण इतकंच आहे, की पैसा म्हणजेच आयुष्यात सगळं काही नाही, हे मात्र या पिढीला माहिती नाही. स्वत:च्या पलीकडं जाऊन आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचाही विचार केला पाहिजे, हे त्यांच्या गावीही नाही. इंटरनेटमुळे आपल्या बोटांच्या तालावर जग जिंकू पाहणारी ही मुलं ज्या गावात राहतात त्या समाजापासून मात्र पूर्णपणे तुटलेली आहेत. त्यांना जो प्रचंड पैसा मिळतो तो केवळ त्यांच्या कर्तबगारीमुळं नसून त्याला इतरही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कारणं आहेत, हे समजावून घेण्याची त्यांना गरज वाटत नाही. त्या पैशामुळं त्यांच्या डोळ्यांपुढं एक दाट धुकं पसरलेलं आहे. त्यामुळे ज्या शहरात आपण राहतो तिथून पन्नास किलोमीटरवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तिथं लोकांना उपासमारीमध्ये दिवस काढावे लागत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत, कोवळी मुलं कुपोषित होत आहेत, या प्रखर वास्तवाशी त्यांचं काही देणं-घेणं उरलेलं नाही. नाती म्हणजे काय, समानता म्हणजे काय, सर्वांगीण विकास म्हणजे काय, मूल्यं म्हणजे काय, ती का जपायची असतात, आपला देश म्हणजे काय, या कशाशीच त्यांचा संबंध दिसत नाही. ही सगळी परिस्थिती पाहून मी खूप व्यथित होतो. हे सगळं वर्णन आजच्या पिढीच्या प्रत्येक मुलाला किंवा मुलीला लागू पडणार नाही हे मला ठाऊक आहे. या सगळ्याला अपवाद ठरतील अशी मुलं-मुलीही आहेतच, पण ती अपवादानंच. पण एक पिढी म्हणून कोणीही डोळसपणे पाहिलं तर मी वर्णन केलेल्या खुणा निश्चितपणे दिसतील.
आता प्रश्न एकच उरतो : या पिढीच्या या अवस्थेला जबाबदार कोण? मी स्वत: त्या मुलांना संपूर्ण दोष द्यायला तयार नाही. कारण त्यांच्यापेक्षा अधिक दोष आमच्या पिढीकडं येतो, असं मला वाटतं. कारण त्यांना घडवण्याची संपूर्ण जबाबदारी आमच्यावर होती. त्यांना स्वत:च्या पायावर उभं करण्याच्या नादामध्ये चांगले नागरिक घडवण्याचं मात्र आमच्याकडून राहूनच गेलं. आमच्या आधीच्या पिढीनं आम्हाला दिलेली नीतिमूल्यं आम्ही आयुष्यभर जपली; पण मधल्या काळात ती कुठं तरी हरवली, असं आता या पिढीकडं पाहताना लक्षात येतं. आमच्या आधीच्या पिढीनं अतिशय दारिद्र्यात दिवस काढले; पण आम्हाला घडवताना त्यांनी चांगली मूल्यं, चांगले संस्कार आमच्यामध्ये खोलवर रुजवले. आम्ही लहानपणी गरिबी पाहिली असली, तरी नंतर पैसाही मिळवला आणि उपभोगलासुद्धा. मग असं असूनही आमच्या मुलांना संस्कार देण्यात                      
[7:46 PM, 5/2/2017] +91 82759 41474: आता प्रश्न एकच उरतो : या पिढीच्या या अवस्थेला जबाबदार कोण? मी स्वत: त्या मुलांना संपूर्ण दोष द्यायला तयार नाही. कारण त्यांच्यापेक्षा अधिक दोष आमच्या पिढीकडं येतो, असं मला वाटतं. कारण त्यांना घडवण्याची संपूर्ण जबाबदारी आमच्यावर होती. त्यांना स्वत:च्या पायावर उभं करण्याच्या नादामध्ये चांगले नागरिक घडवण्याचं मात्र आमच्याकडून राहूनच गेलं. आमच्या आधीच्या पिढीनं आम्हाला दिलेली नीतिमूल्यं आम्ही आयुष्यभर जपली; पण मधल्या काळात ती कुठं तरी हरवली, असं आता या पिढीकडं पाहताना लक्षात येतं. आमच्या आधीच्या पिढीनं अतिशय दारिद्र्यात दिवस काढले; पण आम्हाला घडवताना त्यांनी चांगली मूल्यं, चांगले संस्कार आमच्यामध्ये खोलवर रुजवले. आम्ही लहानपणी गरिबी पाहिली असली, तरी नंतर पैसाही मिळवला आणि उपभोगलासुद्धा. मग असं असूनही आमच्या मुलांना संस्कार देण्यात आम्ही का कमी पडलो? अब्राहम लिंकननं त्याच्या मुलाच्या शिक्षकांना लिहिलेलं फार सुंदर पत्र आहे. ते पत्र आम्ही जरूर वाचलं, इतकंच काय आमच्या मित्रांच्या मुलांच्या वाढदिवसांना ‘भेट’ही दिलं पण मग स्वत:ची मुलं घडवताना त्याचा विसर आम्हाला का पडला? व्यापक समाजाचं भान मुलांना देण्याऐवजी ‘तू तुझ्यापुरतं पाहा; जगाचं काय व्हायचं असेल ते होवो,’ इतका संकुचित विचार आम्ही आमच्या पुढच्या पिढीला का दिला? अत्यंत कष्टात दिवस काढूनही आमच्या वडिलधार्यांनी तो उत्तम वारसा आम्हाला दिला होता तो आम्ही इतका संकुचित का करून टाकला? या चुकीची जबाबदारी स्वीकारण्यावाचून मला पर्याय दिसत नाही. नसलेली पळवाट शोधण्याची खटपट मी तरी करणार नाही. आयुष्याच्या एका बेसावध वळणावर आम्ही आत्ममग्न झालो, इतकाच या सगळ्याचा माझ्या मते अर्थ आहे. त्या आत्ममग्ननेत आम्ही जे पेरलं त्याचं पीक आज आपण पाहतो आहोत. कोणत्याच पिढीला आपल्या पुढच्या पिढीचं उत्तरदायित्व नाकारता येत नाही. तसं ते नाकारूही नये. समोरच्याकडे एक बोट दाखवण्यापूर्वी स्वत:कडे आलेल्या चार बोटांचा विचार करावा.
मी स्वत: विक्रम गोखले म्हणून या पिढीचा प्रतिनिधी असूनही जरासं वेगळं वागण्याचा प्रयत्न करत राहिलो. मी माझ्या मुलींचे वाढदिवस थाटामाटात साजरे करण्याऐवजी त्या दिवशी त्यांना अनाथ मुलांच्या आश्रमात नेत असे आणि त्या मुलांच्या गरिबीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत असे. माझ्या घरात अनेक वर्षं स्वयंपाकासाठी हरिजन समाजातली बाई होती. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये मी फार पूर्वीपासून सहभागी होतो आहे. पण मी आणि माझ्यासारखे काहीजण अपवाद आहेत. त्यामुळे एक पिढी म्हणून आमच्यावर येणारी जबाबदारी कमी होत नाही, ती झटकण्याचा प्रयत्न मी स्वत: तर कधीही करत नाही. करणार नाही. इतिहासाच्या क्रमामध्ये एक पिढी म्हणून आपण नेमकी काय भूमिका बजावतो, याचा प्रत्येकानं विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आमची पिढी पंचवीस वर्षांपूर्वी जरा वेगळी आणि जबाबदारीनं वागली असती तर कदाचित आजचं चित्र अगदीच वेगळं दिसलं असतं.

विक्रम गोखले
१०४, ए मातोश्री रेसिडेन्सी,
६५, प्रार्थना समाज रोड,
विलेपार्ले-(पूर्व), मुंबई - ४०००५७.                    
             

No comments:

Post a Comment