तुकोबांचे
वारकरी अन् शिवरायांचे धारकरी.....
महाराष्ट्र ही
साधू संतांची पराक्रमी राज्याची,विद्वान अशा महापुरुष्यांची भूमी...!
या भूमीत अनेक थोरा
मोठ्यांनी जन्म घेऊन आपल्या
कार्यकर्तृत्वातून आपल्या सुसंस्कारातून या मातीस पवित्र बनवले ,या
मातीचा ढेकूळ पाण्यात टाकल्यावर जो तवंग उमठेल तो याच
महामानवांच्या विचारांचा आणि संस्काराचाच असेल, आपण या भूमीत जन्म घेतला हे आपले भाग्यच ..! परंतू
या महापुरुषांकडून आपण काय घेतले? आपल्याला आपले महापुरुष निट समजलेच नाहीत किंबहुना आपण ते
समजून घेण्याचा प्रयत्न ही केला नाही.. कदाचीत त्यामुळेच अनेक वर्षापासून आपल्यावर चुकीचा इतिहास खपवला
गेला,आपण झोपलो होतो सताड, आपल्याला झोपेतून जागे करणारं कोणी तरी हवं होतं..आणि हे काम केले ते
शिवश्री.पुरुषोत्तम खेडेकर साहेब, मा.म.देशमुख,डॉ.आ.ह.साळुंखे,श्रीमंत कोकाटे
या विचारवंतांनी,ज्यांच्या मुळे महापुरुष आपल्यापर्यंत
पोहचले..आपण झोपेतून जागे झालो,आत्ताशी कुठे
आपला इतिहास आपण शोधू लागलो आहोत..पुरलेला इतिहास आपण उकरून काढू लागलो आहोत...आपले महापुरुष धूळ खात बसले होते,आपण
ती धूळ झटकून आपण महापुरुषाचा इतिहास समजून घेऊ लागलो आहोत..कोण होते बळीराजा..?कोण
होते तथागत..?कोण होते सम्राट अशोक..?कोण होते तुकोबाराय..कोण शहाजी..कोण जिजाऊ.सावित्री
कोण..अहिल्याराणी कोण...कोण शिवराय..कोण संभाजी..कोण शाहू..कोण फुले..कोण बाबासाहेब..कोण बिरसा
मुंडा..?हे आम्हाला समजू उमजू लागले आहेत..! सत्य काय असत्य काय हे आपल्या बुद्धीच्या कसावर तावुन सुलाखून
घेऊ लागलो आहोत..आम्ही कोणाला गुरू मानलं पाहीजे..?कोणत्या
विचारांचे पाईक व्हायला पाहीजे,कोणावर विश्वास ठेवायला हवा..?कोणाचे
वारकरी व्हायला हवे..?अन् कोणाचे धारकरी व्हायला हवे..?या
प्रश्नांची उकल होत असताना आमच्या समोर उभे राहतात....जगद्गुरू तुकोबाराय.. अन् विश्ववंद्य
छत्रपती शिवराय..!काय जादू आहे या दोन नावात..?हे दोन नावे
म्हणजे परीसस्पर्श..!या दोन नावाचा ज्याने अभ्यास
केला तो आयुष्यात सर्वाच्च स्थानी पोहचला..! आयुष्यात काय व्हायचय तर तुकोबारायांचे वारकरी व्हायचं
अन् शिवरायांचे धारकरी व्हायचं..! कारण,माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे,हा माणुसकीचा
संदेश अवघ्या विश्वाला देऊन हे विश्वची माझे घर म्हणणारे ..जगद्गुरू तुकोबाराय...जे का रंजले गांजले !त्याशी म्हणे
जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा..!असा हा मानवतेचा संदेश देवून जगाच्या कल्याणा संताची
विभूती..देह कष्टविती परऊपकारे....असा देह,अशी संपत्ती जनतेस वाटप करणारा जगातील पहिला सावकार..पहिला
जाणता बळीराजा म्हणजे जगद्गुरू तुकोबाराय होय...सोळाव्या शतकात आर्थिक दुर्बलतेबरोबर बौद्धीक,धार्मीक
दुर्बलता या मातीवर या मातीतल्या मानसावर आली होती, सर्वत्र काही
ठराविक लोकांची मक्तेदारी चालली होती,ही मक्तेदारी दूर करण्यासाठी तुकोबांनी
शब्दाच शस्र म्हणून वापरलं,
“आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ।।
शब्दाचीच यत्ने शस्त्रे करू। शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन ।। शब्द वाटू
धन जनलोका। तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव ।
शब्देचि गौरव पुजा करू। “
तुकोबांची विठ्ठल भक्ती हा निखळ भक्तीचा
कळसच..तुकोबाराय म्हणतात माझा विठ्ठल माझा कर्ता धर्ता
गोरगरीब,अनाथांचा नाथ
आहे आणि त्याला भेटण्यास मंत्र, तंत्र,यज्ञ,पूजा,जप,तप,
ध्यान,धारणा
तसेच भोंदू
बाबा,सोनं नाणं अशा कशाची व कोणत्याही
मध्यस्थीची गरज नाही,तेथे कसलाही भेदभाव नाही, विष्णुमय
जग वैष्णवांचा धर्म
। भेदाभेदभ्रम अमंगळ ||असे म्हणून परखडपणे विठ्ठलाचे दार खुले करतात..
सोबत वेदाचा
अर्थ आम्हालाच ठाऊक आहे हे निर्भीडपणे सांगून
विद्रोही बनतात .! खर तर माझे तुकोबाराय काय आहेत तर....
“अनु रेनुया थोकडा तुका अकाशा एवढा ...”
अशा या आकाशा एवढ्या तुकोबांचे आपण वारकरी आहोत
त्यांच्या भक्तीचा वसा आपण चालत आहोत,
ज्या काळापर्यंत भारतभूमीसह जगात अनेक राजे
महाराजे, शहा,बादशहा सम्राट झाले होते,परंतू..
“शिव तुझे नाव ठेविले पवित्र ..
छत्रपती सूत्र विश्वाचे तू..”
ज्यांनी शिवरायांना सोळाव्या वर्षी छञपती पदवी
बहाल केली,त्यांच्या साठी पाईकांचे अभंग रचले, त्यातून
तरूणांना स्वराज्यासाठी प्रेरणा मिळाली अनेक
तरूण स्वराज्य रक्षणांस सज्ज झाली, वारक-यांचा भगवा
ध्वज..शिवशाहीचा भगवा ध्वज पेलण्यास सज्ज
झाले..! शहाजी राजांनी दिलेल्या छोट्याशा जाहागिरीवर
शिवरायांनी स्वराज्य उभा केलं ते
जिजाऊ-शहाजींच्या संस्कारावर आणि पेटत्या दिव्यावर पतंगाने झेप घ्यावी
तशा मावळ मातीतल्या मावळ्यांच्या झेपेवर अन
त्यांच्या जिगरबाज शौर्याच्या पराक्रमावर..! तो काळच तसा
होता,महाराष्ट्रावर आदिलशाही,निजामशाही
सारख्या सत्तेच्या वादळांनी महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता,रयत ञासून गेली होती,शहाजी राजे
आदीलशाहीत नोकरीस होते,त्यांना हे दृष्य पाहवत नव्हते,त्यानी
हिंदवी स्वराज्याचा संकल्प केला, आऊसाहेब जिजाऊ
यांनी ते स्वप्न पाहीलं,आपल्या प्रजेचं राज्य येवून रयत सुखी व्हावी,या
सुंदर व विशाल स्वप्नासाठी शिवबा नावाच्या लेकरांस
खतपाणी घालून ते स्वप्न पुर्ण केलं,स्वप्न पाहावं आई वडीलांनी आणि पुर्ण करावं ते लेकरानं हे इतिहास आपल्याला
सांगतो.. आज कालची आईवडील म्हणतात,बाळा अंथरून
पाहून पाय पसरावेत,परंतू हे सांगत बसण्यापेक्षा बाळा, तूला
जेवढे पाय पसरावयाचे आहेत तेवढे पाय
पसर..अंथरूनाचं काय करायचं हे तूझा बाप पाहून घेईल असा
आत्मविश्वास आज देताना कोणी कुठेही दिसत
नाही..! तो आत्मविश्वास आपल्याला प्रथम येणा-या पिढीला
द्यावा लागेल,शिवराय जन्माला
यावेत असे आपण म्हणतो तेव्हा सर्वप्रथम जिजाऊ, शहाजी राजे आपण
होणे
गरजेचं आहे ,तेव्हाच आपली
स्वप्न पुर्ण होतील..!
खरं तर शिवरायांना कशाचीही कमी नसणारा एका
ऐश्वर्य संपन्न राजाचा मुलगा ,सुख संपत्ती, नोकर चाकर
सर्व काही उपलब्धी तरीही रानावनात,दगड
धोंड्यात सह्याद्रीच्या कड्यकपारीत या मावळ मातीत,मातीतल्या
माणसात का फिरला..? काय हवं होतं..?या
प्रश्नाचं उत्तर एकच स्वराज्य माझ्या आठरा पगड
जातीचं माझ्या
रयतेच राज्य..! दऱ्या खोऱ्यातील या मावळ्यांना
महाराजांनी विश्वास दिला, स्वत:पेक्षाही मावळ्यांची काळजी
त्यांनी अधिक घेतली म्हणूनच महाराज
मावळ्यांच्या काळजात होते, आज गेली ३५०/३८८ वर्ष झाली तरीही हा
राजा महाराष्ट्रातील माणसाच्या ह्रदयावर
त्यांच्या काळजावर घर करून सिंहासनाधिष्ट आहे,आजही काल
जन्माला आलेल पोरं जय जिजाऊ चा नारा ऐकताच जय शिवराय
एका ठेक्यातच म्हणतयं ही जादू आहे या राजाची म्हणूनच विश्ववंद्य कुळवाडी भूषण शिवरायांचे
गुणगाण संपुर्ण महाराष्ट्रच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातून होतो आहे .! तुकोबांच्या संस्कारांचे आणि शिवरायांच्या
विचारांचे,त्यांच्या स्वराज्याचे धारकरी आज आपण आहोत..!या मेरूमंदार भक्तीशक्तीच्या आचारांचा त्यांच्या
विचारांचा वसा आणि वारसा आपल्याला चालवायचा आहे,भक्ती करायची ती तुकोबारायांसारखी निखळ व शुद्ध
अंतकरणाने,हे विश्वची माझे घर म्हणून आठरा पगड जाती धर्मांना सोबत घेऊन, कोणाही जिवाचा
मत्सर न करता, खरा धर्म सकल जनांस सांगून दया क्षमा शांती,रूढी,परंपरा, अंधश्रद्धा,विज्ञाननिष्ठा,निसर्गप्रेम,सत्य
काय असत्य काय हे स्वत:च्या बुद्धीने तपासून आत्मसात करून या वैष्णवांना वाटायच आहे..!
तुकोबारायांनी शिवरायांना छाञतेजाचे संस्कार
देऊन कर्मयोग उलगडून सांगितला..! हा गुरू शिष्याचा ठेवा
भक्तीशक्ती नावाने जगात आदर्श ठरला...!
आज हा ठेवा आपल्याला जपायचा आहे,त्यासाठी
आपल्याला आज तुकोबारायांसारखे अभंग रचायचे नाहीत,
किवा शिवरायांसारखी तलवार हातात घेऊन युद्धही
खेळायचे नाही, मग काय करायचे आपल्याला..? तुकोबारायांनी अभंग का रचले,कारण त्या काळी
शब्द हेच शस्र होते,म्हणून गाथा रचली, शिवरायांनी
लढाया या साठी केल्या कारण महाराष्ट्रावर परकीय सत्तेने नंगानाच
चालला होता,रानबोके माजले होते त्यांना फाडून काढण्यासाठी
शिव सिंहाने लढाया केल्या..! आजची लढाई काय आहे?आजची शस्र काय
आहेत, हे आपल्याला पाहावी लागतील..!
आजची
राजसत्ता,धर्मसत्ता,अर्थसत्ता,शिक्षणसत्ता,प्रचार
प्रसार माध्यमसत्ता आपल्याला काबीज करायची आहेत,एक सर्व धर्म समभावाची शासन व्यवस्था
ऊभा करायची आहे, शेतकरी, कामकरी, कष्टकरी
यांचे राज्य आणायचे आहे,ईडा पिडा टळून
बळीचं राज्य आणायचं आहे..!सामाजिक ,धार्मीक,जातीय,सलोखा
निर्माण करायचा आहे,एकमेकांची डोकी फोडायची नाहीत तर डोके
सुधरायचे आहेत,माझ्या या पविञ भूमीला दंगलमय नाही तर मंगलमय करायचे आहे..! शिवशाही निर्माण करायची
आहे, तुकोबांचे वारकरी अन् शिवरायांचे धारकरी म्हणून ही भगवी पताका अभिमानानं फडकावयाची आहे..!!
आज ‘१९ फेब्रुवारी शिवमंगल दिन’ म्हणजेच
महाराष्ट्राचा स्वाभिमान,कुळवाडी भूषण,रायेतेचे राजे,विश्ववंद्य
छत्रपती शिवराय यांचा जन्मोत्सव, या
निमित्ते,हा तुकोबारायांचा वारकरी अन शिवरायांचा धारकरी आज स्वराज्य संकल्पक शहाजी राजेंना,आऊसाहेब
जिजाऊनां,शिव-शाहू- फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रीयन रयतेला,शिवरायांना त्यांच्या कार्याला,त्यांच्या मर्द
मावळ्यांना मानाचा मुजरा करून हा लेख त्यांच्या चरणी सुपूर्द करतो..!
! जय जिजाऊ जय शिवराय
शिवश्री संतोष राहीबाई भगवान तळेकर मो.८२७५९४१४७४
No comments:
Post a Comment