साबरमती के संत …
दे दी हमें आजादी बिना खडग बिना ढाल
साबरमती के संत तूने कर दिया कमाल
रघुपति राघव राजा राम…
साबरमती के संत तूने कर दिया कमाल
रघुपति राघव राजा राम…
हे
गीत काल कानावर पडले,आणि ज्या वयात विचारांच्या कक्षा आजीबात रुंदावल्या नव्हत्या
त्या वयात प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील मुलांसमोर,गुरुजी समोर व गावातील
प्रजेसमोर मांडलेले तात्यांनी लिहून दिलेले सहावीच्या वर्गातील माझे राष्ट्रपिता
बापुजी मला आठवतात....
आपले संपूर्ण
आयुष्य भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी खर्च करून देशाला जुलमी साखळदंडातून मुक्त
करणारे बापुजी... बापूंचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. २ ऑक्टोबर १८६९ रोजी
गुजरातच्या पोरबंदर येथे करमचंद व पुतळीबाई यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला.त्यांना
लहानपणापासूनच वाचनाची आवड होती श्रावणबाळ आणि हरिश्चंद्र या दोन कथांचा छोट्या मोहनदासच्या
मनावर मोठा परिणाम झाला, बापुजी म्हणतात,"त्याने मला झपाटले आणि मी अगणित
वेळा माझ्याशीच हरिश्चंन्द्रासारखा वागलो असेन" गांधीच्या सत्य आणि प्रेम या
दैवी गुणाशी झालेल्या स्व:ओळखीचा माग हा या पौराणिक पात्रांपर्यंत येऊन पोहोचतो.
बापू
शालेय शिक्षण संपवून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी इ.स.१८८८ मध्ये इंग्लंडमध्ये
लंडनला युनिव्हर्सिटी कॉलेज,
वकिलीचे शिक्षण घेण्यास गेले.ते
पूर्ण करून त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरु केला,त्यांना इंग्रज सरकारकडून तिरस्कृत आणि
अपमानित वागणूक मिळाली,त्यातून त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध अन्यायाच्या विरुद्धात
अहिंसेचे आंदोलन सुरु केले,त्यांतर ते भारतात आले.
बापुजी भारतात आल्यामुळे अहिंसेला एक उर्जा
मिळाली.त्यातून अनेक क्रांतिकारक उभा राहिले.चंपारण्य आणि खेडा आंदोलन,असहयोग आंदोलन,मिठाचा सत्याग्रह (दांडी यात्रा),भारत
छोड़ो आंदोलन सारख्या आंदोलनातून त्यांनी भारताला १५ ऑगस्ट
१९४७ रोजी स्वातंत्र्य मिळवून दिले.
महात्मा
गांधी म्हणतात, हत्यार आणि हिंसा कोणत्याच समस्याचे समाधान नाही,हिंसा
एकमेकांबद्दल राग,द्वेष,तिरस्कार निर्माण करते,तर अहिंसेने शत्रूवर विजय मिळवता
येतो,ही शिकवण ते आयुष्यभर देत राहिले.
बापूंची
ईश्वरभक्ती ही त्यांच्या कामात होती,शरीर आणि मन
अस्वच्छ असेल, तर परमेश्वर कधीच प्राप्त होऊ शकणार नाही. मात्र, माणसे तना-मनाने
स्वच्छ हवी असतील, तर त्याचे शहर आणि परिसरही स्वच्छ हवा.स्वच्छ भारताचे उद्दात व उतुंग
स्वप्न त्यांनी पाहिलं.
एकवेळेस एका इंग्रज
अधिकाऱ्याने बापूंना विचारले,बापुजी तुम्हाला एका दिवसाचे भारताचे वायसराय बनवले
तर तुम्ही काय कराल..? त्यावेळी बापुजी म्हणतात,राजभवन जवळ जी अस्वच्छ वस्ती आहे
ती मी सर्वप्रथम साफ करेल...! इंग्रज अधिकाऱ्याने पुन्हा एकदा तोच प्रश्न केला,की
बापुजी तुम्हाला पुन्हा एक दिवस त्याच पदावर ठेवले तर..बापुजीनी पुन्हा तेच उत्तर
दिले..की मी दुसऱ्या दिवशीही तेच काम करेल.यातून स्वच्छतेबद्दल असलेली भूमिका
आपल्यास समजते.
बापूनी
एक दिवस एका शाळेस भेट दिली तेव्हा सर्व शिक्षकाना बापू म्हणाले,की पुस्तकी
ज्ञानाबरोबर जेवण बनवणे त्याच बरोबर स्वच्छतेचे कामही मुलांना शिकवा..तेव्हाच तुमची
शाळा आदर्श बनेल..हा मूलमंत्र चालता बोलता त्यांनी देवून टाकाला.
Cleanliness is next to Godliness - म.
गांधी याच्या या घोष वाक्यास अनुसरुन मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमके
आपल्या मर्मावर बोट ठेवून स्वच्छता अभियानाची सुरुवात केली आहे. सरकारने बापूंच्या
चष्म्याचा लोगो ‘स्वच्छ भारत’ अभियाना बरोबरच रुपया पासून ते रेल्वे तिकीटा
पर्यंत वापरला आहे,हा सन्मान सरकारसाठीच न रहता तो जनसामन्यापर्यंत पोहचावा व तो
अबाधित राहावा.आज बापूंची
जयंती त्या निमित्त सर्वांना स्वच्छतेची शपथ घेण्याची विनंती करतो.देश आपल्या
सर्वांचा आहे तो सर्वांनी स्वच्छ ठेवायचा आहे,या देशाचे भविष्य आपल्या, युवांच्या हातात आहे. लक्षात ठेवा,”कुठलाही देश परफेक्ट नसतो तो बनवावा लागतो“. माझ्या बरोबर म्हणा, “आज मी ग्रीन
आणि क्लीन इंडिया बनविण्यासाठी प्रतिज्ञा घेतो, मी रस्त्यावर
कचरा फेकणार नाही आणि कुणाला फेकू ही देणार नाही. मी माझ्या घरच्यांना आणि
मित्रांना स्वच्छतेचे महत्व पटवून देईन. मी माझ्या भारताला स्वच्छ आणि सुंदर बनवेन.
आज
जगाकडे पाहीले की एक लक्षात येते की,स्वच्छतेचा मुद्दा त्यांनी एकदाच असा
राबवला की त्यासाठी त्यांना रोज मार्केटिंग किंवा जनजागृती वारंवार करावी लागतं
नाहीं,दुसऱ्या देशात सफाई साठी आत्याधुनिक मशीन्सद्वारे स्वच्छता राबवली जाते,परंतू
आजही आपल्या देशात गटार साफ करण्यासाठी प्रत्यक्ष गटारात माणसालाच उतरावे लागते,हाजारो
सफाई कामगार आपला जीव त्यात गमावत आहेत , हजारों कामगार
दुर्धर आजारांना बळी पडत आहेत, माणुस म्हणून त्यांना कधी जगू देत नाहीत,त्यावर
आपण काही यंत्र विकशीत केली पाहिजेत.
आज प्रत्येक माणूस धर्मात, जातीत, पंथात विभागला गेला आहे. बापू म्हणायचे, माणसातील माणुसकी प्रकट करणारा तो खरा धर्म.
उच्च-नीच भाव निर्माण होत असेल, तर त्या धर्माला
मी धर्म मानणार नाही. जोपर्यंत मानवजातीत ऐक्याच्या भावनेस महत्त्व दिले जात नाही, तोपर्यंत प्रार्थना, उपवास,
जप तप निरर्थक आहेत.असे
अमोल विचार बापूनी आपल्यास दिले.
गांधी हे केवळ एक नाव नाही तर एक अष्टपैलू विचार आहे... जो समाजाला
सर्वधर्म समभावाची शिकवण देतो... समाजाला सर्वोदय उत्थानाचा मार्गावर घेऊन जातो...
स्पृश्य अस्पृश्यता बाजूला सारत माणूस म्हणून जगवणे शिकवतो... शांती, प्रेम, अहिंसेच्या
मार्गाने पुढे घेऊन जात एक सभ्य मानवी समाजाची निर्मिती करतो.बापूंचे हे विचारच आम्हाला यापुढेही जिवंत ठेवायचे
आहेत,कारण तेच भारत देश महासत्ता बनवणार आहेत..!!
राष्ट्रपिता बापूंच्या जयंतीदिनी त्यांना शतशः नमन..!
श्री.संतोष भगवान तळेकर
(प्रा.शिक्षक खानिव,ता.डहाणू,जि.पालघर)
8275941474
No comments:
Post a Comment