भक्तीशक्ती

भक्तीशक्ती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत..!! .
web toolsHtml Codes

शहीद भगतसिंग

                  शहीद भगतसिंग..!                                                                                                                                                                    

"यूँ तो जर्रे - जर्रे में खुदा बसता है ऐ दोस्त ...
पर मै सजदा करता हूँ उस जगह जहाँ कोई ' शहीद ' हुआ हो ..!!"
   स्वातंत्र्याच्या धगधगत्या समरात सर्वस्वाची आहुती देताना अनेक वीर भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करून हसत हसत फासावर गेले... त्या सशस्त्र क्रांतिकारकात वीर  भगतसिंग  यांचे स्थान अद्वितीय आहे. म्हणूनच त्यांना  शहीद-ए-आलमअसा किताब दिला जातो.
   स्वातंत्र्याच्या या धगधगत्या एल्गार असलेल्या भगतसिंगाचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ रोजी पंजाबातील बंग या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. वडील किशनसिंग यांना क्रांतिकारी वाड्मयाचा प्रसार केल्या बद्दल मंडालेच्या तुरुंगात त्यांना सजा भोगावी लागली होती. भगतसिंगावर बालपणीच बाळकडू मिळाले खर तर त्यांचे कुटुंब हे ईश्वराची पूजा-अर्चा करणारे परंतू भविष्यात भगतच्या तल्लख बुद्धीने अशी उंची गाठली की सत्य-असत्य यावर स्वत:च्या बुद्धीने ते घासून तासून पाहू लागले त्यांच्यात कमालीची प्रगल्भता आली आणि मी नास्तिक का असे लिखाण त्यांनी केले.
      भगत लहान पाच-सहा वर्षाचा असताना एकदा काय झाले की,त्याच्या काका सोबत शेतावर गेला होता काका शेतात गव्हाची पेरणी करीत असता तेही त्यांना मदत करू लागले. तेव्हा त्यांच्या काकाने त्यांना विचारले भगत, कसली पेरणी करतोय ?” यावेळी तो म्हणाला, मी बंदुकीच्या बिया पेरत आहे ”,  का? असा प्रश्न काकांनी विचारला असता भगतसिंग म्हणाले कां म्हणजे काय?’ या बंदुकीच्या  बियांची झाडे झाली म्हणजे त्यांच्या वर बंदुका येतील आणि मग त्या बंदुकातून गोळ्या झाडून मी इंग्रजांना मारीन व माझा देश स्वतंत्र करीन”.असा विचार त्याच्या बालमनात त्या बियासोबत रुजला,वाढला आणि सर्वोच्च स्थानी पोहचलाही ...!!
         भगतचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बंग येथे झाल्यावर भगत लाहोरच्या डी. ए. व्ही. व पुढे न्यशनल कॉलेज मध्ये १९२३ साली बी. ए. झाले.  कॉलेज शिक्षण चालू असतानाच अनेकांना अनेक गुलाबी स्वप्न पडतात,याच वळणावर अनेक शपथ घेतल्या जातात,परंतू या भगतला स्वप्न पडत होती स्वातंत्र्याची..                                                             मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ है मेरी कलम कि                                       मै इश्‍कभी लिखना चाहूँ, तो इन्कलाबलिखा जाता है.- भगतसिंग                            त्या स्वप्नातूनच त्यांनी आजन्म अविवाहित राहून देश्याच्या स्वातंत्र्यासाठी जीवन समर्पित करण्याची शपथ घेतली. त्याच प्रमाणे बी.ए. होताच त्यांनी क्रांतीकारकाच्या संघटनेत प्रवेश केला. पुढे सुखदेव, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, जतींद्रनाथ दास आदी कट्टर क्रांतीकारकांच्या साहायाने त्यांनी  ‘नव जवान भारत सभा’ ही संघटना सुरु केली. दिनांक ९ फेब्रुवारी १९२५ च्या रात्री लखनौ जवळच्या काकोरी स्टेशनातून सरकारी खजिना घेऊन निघालेली एक रेल्वे आगगाडी वाटेत अडवून तिच्या तील सर्व खजिना त्या क्रांतीकारकांनी पिस्तुले खरीद्न्यासाठी व बॉंब तयार करण्यासाठी लांबविला.             भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना जी शिक्षा झाली ती कायदेमंडळात बाँब फ़ेकला म्हणून नाही, तर सेंडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली ...! ही हत्या १७ डिसेंबर, १९२८ रोजी झाली होती. त्यावर खटला चालवण्यात आला.त्यांना कारावासात ठेवण्यात आले..! कारावासात कधी रिकामा वेळ मिळाला की, भगतसिंग हे शहीद रायप्रसाद बिस्मिल्ला यांच गाणं मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे........ मोठ्या तन्मयतेने म्हणत असत. त्यामुळे राजकैद्यांमध्ये देशाप्रति निष्ठा व स्वाभिमान वाढीस लागे.    एकदा जयकौर ( भगतसिंगची आजी) जेलमध्ये भेटायला आली असता हसत-हसत गंमतीने, भगतसिंग म्हणाले, ''ये आजी ! तुला एवढ्या लांबून भला भेटायला यायला फार त्रास होतो ना? तू असं कर, या जुलुमी सरकारविरुद्ध काहीतरी गंभीर गुन्हा कर, म्हणजे तुला माझ्या जवळच कैदी म्हणून कायमचं राहायला मिळेल''                                                        क्रांती करायची असेल तर आपणास प्रेरणा व संजीवनी देणारे औषध हवे असते,ते औषध पुस्तकाशिवाय कोणीही देणार नाही म्हणून भगतसिंगानीही खूप वाचन केले, त्यांचा व्यासंग दांडगा होता. क्रांतिसाहित्याने त्यांना जणू झपाटून टाकले होते. सचिंद्रनाथ संन्याल यांचे 'बंदी जीवन' हे त्यांना प्रभावित करणारे बहुधा पहिले पुस्तक असावे. ऑस्कर वाइल्डचे 'वीरा-दी निहिलिस्ट', क्रोपोटकिनचे 'मेमॉयर्स', मॅझिनी व गॅरिबाल्डी यांची चरित्रे, वॉल्टेर, रूसो व बकुनिनचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते. त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी फार मोठी होती. त्या यादीत विक्टर ह्युगोची 'ला मिझरेबल', हॉलकेनचे 'इटर्नल सिटी', अप्टन सिंक्लेअरची 'क्राय फॉर जस्टिस', रॉस्पिनची 'व्हॉट नेव्हर हॅपन्ड', गॉर्कीची 'मदर' ह्या कादंबर्‍याही होत्या जर क्रांती व्ह्यायला हवी असेल तर समाजाची मानसिकता त्या दृष्टीने घडविली पाहिजे व तसे होण्यासाठी क्रांतिवाङ्मयाचा प्रसार अपरिहार्य़ आहे असे त्यांचे मत होते. त्यांनी फ्रेंच क्रांतिकारक व्हिलांत वाचला होता. साम्यवादी समाजरचना व शोषणमुक्त सक्षम समाज घडविण्यासाठी त्यांनी लेनिन, मार्क्स, टॉलस्टोय, गॉर्की, बकुनिन यांचे साहित्य अभ्यासले होते.गुलामी आणि दारिद्र्य हे जगातले सर्वांत घोर पाप असेल तर त्याच्यासाठी देवाला साकडे घालण्यापेक्षा स्वतःला सक्षम करण्याचा व त्यागावाचून आणि साहसावाचून उद्धार नसल्याचा संदेश देणारे त्यांचे विचार आणि लिखाण होते. केला त्यांनी आयरिश क्रांतिकारक डॉन ब्रिन याच्या पुस्तकाचा अनुवाद 'मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम' बलवंतसिंग या नावाने केला.                                       फाशीचा दिवस 23 मार्च निश्चित झाला.वीर भगतसिंग,राजगुरू, सुखदेव यांना खबर मिळाली.मृत्यू अटळ असतांना भगतसिंगांनी आपल्या आईला पत्र लिहिले.त्या पत्रात भगतसिंग लिहितात, भगतसिंग आपल्या आईला (बेबेजी) म्हणत, ''फाशी झाल्यावर तू माझं शव घ्‍यायला येऊ नको, कुलबीरला पाठव, कारण तू रडायला लागली तर लोक म्हणतील, भगतसिंगची आई रडत आहे'' प्रत्येक भारतीयाला भगतसिंग यांच्या रुपात साक्षात मृत्युंजय दिसत होता. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या हौतात्म्याविषटी नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, ''हे क्रांतीवीर जरी आपल्यातून निघून गेले असले तरी, त्यांच्या राष्ट्रप्रेमाची भावना अजिंक्य असून ती अमर आहे.'' भगतसिंग यांच्या महान क्रांतिकार्याची गाथा ऐकून रशियाचे सर्वेसर्वा स्टॅलिन यांनी भगतसिंग यांना मास्कोला येण्याचे निमंत्रण दिले होते.                                                                      फाशीच्या तक्त्यावर वीर भगतसिंगांना नेण्यात आले, त्यांना शेवटची इच्छा मॅजिस्ट्रेटने विचारली असता, भगतसिंग म्हणाले ''क्रांती ये मानव का निसर्गदत्त हक है ! तो, आझादी ये उसका जन्मसिद्ध हक है ! आझादी और जिंदगी एक बात है ! तो गुलामी और मौत एक बात है'' हाच अखेरचा संदेश त्यांनी राष्ट्राला दिला. मॅजिस्ट्रेटला उद्देशून ते म्हणाले, मॅजिस्ट्रेट महोदय तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. आज तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे की, भारतीय क्रांतीकारक आपल्या सर्वोच्च आदर्शासाठी मृत्युचं स्वागत कसं करतात.'' त्याचवेळी फाशी देणाऱ्या जल्लादाच्या डोळ्यात पाणी आले आणि तो म्हणाला भगतसिंग मैने आजतक बहुतसे लोगो को फाँसी दी मगर मैंने तेरे जैसा शक्स पहिली बार देखा बहुतसे लोग यहाँ आकर रोंये बहुतोंने मुझसे दया की भिख मांगी किसीने पैर पकडे,कोई गिडगिडाये किसीने माँ,बाप,बहन,भाई,बिवी,बच्चों से मिलनेंकी,इच्छा जताइ कइ यहाँसे भाग गये मगर भगतसिंग मैंने आजतक तेरे जेसा मर्द नही देखा... मृत्यू डोळ्यासमोर नाचत असतांना सुध्दा एवढा करारी बाणा भगतसिंगांमध्ये फक्त आणि फक्त देशभक्तीमुळेच ....!                        'दिल से निकलेगी न मरकर भी वतन की उलफत ! मेरी मिट्टी से खुशबू-ए-वतन आएगी'' मृत्युकडे नेणार्‍या फासाचं त्यांनी चुंबन घेतलं.त्याचवेळी ओठातून शब्द बाहेर पडले,      मेरा रंगदे बसंती चोला                                                                मेरा रंगदे बसंती चोला                                                       'इन्किलाब  झिंदाबाद, वंदे मातरम, भारत माता की जय' असा जयघोष देत हे तिन्ही क्रांतिकारक २३ मार्च,१९३१ रोजी भगतसिंग लाहोरच्या तुरुंगात हसत-हसत फासावर चढले.  आणि भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी तिचे हे सुपूत्र शहीद होऊन अमर झाले.                                    'मी नास्तिक का झालो' - शहीद भगतसिंग  "त्या दिवसापासून काही पोलीस अधिकारी मी नियमितपणे दोन वेळा देवाची प्रार्थना करावी म्हणून माझे मन वळवू लागले. मी तर नास्तिक होतो. फक्त शांततेच्या व आनंदाच्या काळातच मी नास्तिक असल्याची बढाई मारू शकतो, की अशा कठीण प्रसंगीदेखील मी माझ्या तत्त्वांना चिकटून राहू शकतो, याची माझ्यापुरती तरी मला कसोटी घ्यावयाची होती. बर्‍याच विचारान्ती मी निर्णय घेतला की देवावर विश्वास ठेवणे व त्याची प्रार्थना करणे हे माझ्याकडून होणार नाही. नाही, ते कधीही शक्य नाही. ती खरी कसोटीची वेळ होती आणि त्यातून मी यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन बाहेर पडलो. इतर काही गोष्टींच्या बदल्यात स्वतःची मान वाचवण्याची इच्छा मी कोणच्याच क्षणी केली नाही. म्हणजे मी कट्टर नास्तिक होतो आणि आजपर्यंत नास्तिकच राहिलो आहे. त्या कसोटीला उतरणे ही साधी गोष्ट नव्हती.                'श्रद्धा'  संकटांची व कष्टांची तीव्रता कमी करते, किंबहूना या गोष्टी ती सुखावहसुद्धा करू शकते. देवावरच्या विश्वासात माणसाला सांत्वन व बळकट राहावे लागते. वादळ आणि तुफानांमध्ये फक्त स्वतःच्या पायावरच उभे राहणे हा काही पोरखेळ नाही. अशा कसोटीच्या क्षणी गर्व, जर असलाच तर पार वितळून जातो. माणूस इतर सर्वसाधारण माणसांच्या श्रद्घांना बेदरकारपणे धुत्कारू शकत नाही, आणि त्याने जर असे केलेच तर आपण असाच निष्कर्ष काढला पाहिजे की त्याच्याकडे केवळ पोकळ ऐट नव्हे तर याहून दुसरी अशी काही शक्ती असली पाहिजे. सध्या माझी स्थिती ही नेमकी अशीच आहे. न्यायालयाचा निकाल हा आधीपासूनच ठरलेला आहे. आठवड्याभरात जाहीर व्हायचा आहे. मी माझ्या ध्येयासाठी प्राणाचा त्याग करत आहे याखेरीज दुसरे कोणते सांत्वन माझ्याकरता असू शकते?         एखादा देवावर विश्वास ठेवणारा हिंदू आपण पुढच्या जन्मी राजा म्हणून जन्मावे अशी अपेक्षा करत असेल, एखादा मुसलमान  किंवा ख्रिस्ती आपल्या हाल-अपेष्टांचे व त्यागाचे बक्षीस म्हणून स्वर्गात भोगायला मिळणार्‍या ऐश्वर्याची स्वप्ने पाहत असेल, पण मी कशाची अपेक्षा करावी? मला चांगली कल्पना आहे, की ज्या क्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी खेचली जाईल तो शेवटचा क्षण असेल. तोच अंतिम क्षण असेल. मी, किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचे झाले तर माझा आत्मा याचा तेथेच अंत होईल. बस्स इतकेच.         जर असे मानायचे धैर्य मला असेल तर कोणतेही भव्यदिव्य यश न मिळालेले, एक संघर्षाचे, थोड्याच दिवसांचे जीवन हेच खुद्द माझे बक्षीस आहे. याहून जास्त काही नाही. स्वार्थी हेतू न बाळगता, तसेच इहलोकी किंवा परलोकी फळाची अपेक्षा न ठेवता, अगदी निरिच्छपणे मी माझे आयुष्य स्वातंत्राच्या ध्येयासाठी वाहिले, कारण त्याहून वेगळे काही करणे मला जमलेच नसते..             ऐ भगतसिंग तू जिंदा है!                                                          हर एक लहूँ के कतरे में!                                                           हर एक लहूँ के कतरे में!                                                      इंन्कलाब के नारे में !                                                                                                               शिवश्री संतोष भगवान तळेकर                                                प्रा.शिक्षक,जि.प.शाळा खानिव,ता.डहाणू,जि.पालघर                                                        8275941474                                                                                                  https://www.facebook.com/profile.php?id=100004853207402

हा लेख pdf साठी DOWNLOAD क्लिक करा                    
 

                                                                                   

No comments:

Post a Comment