माझा सर्जा शंभूराजा...!
१४
मे १६५७ रोजी ‘पुंरदरावर’शिवराय-सईराणीं या धुंरधराच्या
पोटी जन्माला आलेले युंगधर
म्हणजे शंभुराजे ...पायाला
तुफान बांधून घोंघावणारे झंजावत म्हणजे
शंभुराजे..ज्यांच्या इतिहासाची पाने उलटताना अंगावर काटा
उभा राहतो,तुफानाला कवेत
घेऊन अवघ्या नऊ वर्षात खंबायतच्या अखातापासून भागानगरपर्यंत आणि बु-हाणपुरपासून ते थेट मद्रासपर्यतचा मुलुख टाचेखाली घालणारे छत्रपती
संभाजीराजे,१२०
लढायापैकी एकही लढाई न हरणारा एकदाही तह न करणारा राजा म्हणजे
शंभूराजा ..! हे फक्त भारतीय इतिहासातीलच नव्हे तर जागतीक इतिहासीतील सर्वात मोठे,प्रभावशाली
योद्धे,इतिहासामधील
एक आदर्श,चारित्र्य
संपन्न, संस्कृत पंडित,शाक्तवीर,स्वातंत्र्यवीर व्यक्तिमत्व म्हणजे माझा शंभूराजा ..
शिवरायांनी उभा केलेलं स्वराज्य अभिमानाने अंगावर खांद्यावर पेलून चौपटीने वाढवण्याचे कार्य शंभूराजेंनी केले, तमाम महार्ष्ट्रीयन समाज शिवराया नंतरही शंभूराजेच्या मागे एक दिलाने उभा राहिला. शिवरायांनी आरमाराचे महत्व ओळखले होते, अतिशय दूरदर्शी पणाने त्यांनी सागरी शक्तीचे महत्व ओळखून आरमारही स्थापना केली होती, पुढे याच सागरी आरमाराला चौपटीने वाढवण्याचे काम संभाजी महाराजांनी केले. चंगेखान नावाच्या अरबी सरदार कडून नाव नवीन युद्ध नौका तयार करण्याचे तंत्र त्यांनी अवगत केले, मराठा आरमार अतिशय प्रबळ आणि प्रभावी बनवले.टोपीकर, आदिलशहा, गोव्याचे पोर्तुगीज , निजामशाही, मुगल अशा अनेक शत्रूंची एकाच वेळी लढा देण्याचे काम त्यांनी केले. संभाजी राजे स्वतः रणांगणात उतरत असत, प्रस्थापित जुलमी सत्ताधिशांचा फाडशा पाडणारे शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे.
शिवरायांनी उभा केलेलं स्वराज्य अभिमानाने अंगावर खांद्यावर पेलून चौपटीने वाढवण्याचे कार्य शंभूराजेंनी केले, तमाम महार्ष्ट्रीयन समाज शिवराया नंतरही शंभूराजेच्या मागे एक दिलाने उभा राहिला. शिवरायांनी आरमाराचे महत्व ओळखले होते, अतिशय दूरदर्शी पणाने त्यांनी सागरी शक्तीचे महत्व ओळखून आरमारही स्थापना केली होती, पुढे याच सागरी आरमाराला चौपटीने वाढवण्याचे काम संभाजी महाराजांनी केले. चंगेखान नावाच्या अरबी सरदार कडून नाव नवीन युद्ध नौका तयार करण्याचे तंत्र त्यांनी अवगत केले, मराठा आरमार अतिशय प्रबळ आणि प्रभावी बनवले.टोपीकर, आदिलशहा, गोव्याचे पोर्तुगीज , निजामशाही, मुगल अशा अनेक शत्रूंची एकाच वेळी लढा देण्याचे काम त्यांनी केले. संभाजी राजे स्वतः रणांगणात उतरत असत, प्रस्थापित जुलमी सत्ताधिशांचा फाडशा पाडणारे शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे.
वयाच्या
चौदाव्या वर्षी ‘बुधभुषण’ नावाचा
संस्कृत महाग्रंथ लिहणारे
‘महान संस्कृत पंडित म्हणजे शंभुराजे’ ‘नाईकाभेद’, ‘सातसतक’ सारखे
ग्रंथ‘हिंदी’
‘ब्रिज’ भाषेतील ‘भोजपुरी’ भाषेतील महान ग्रंथ लिहणारे महान हिंदी पंडित म्हणजे ‘शंभुराजे’.
भाषेचे प्रचंड प्रभुत्व असलेला हा राजा, ‘संत तुकाराम’ महाराज याची देहू ते पंढरपुर ही जगातील पहिली वारी सुरु करणारे ”शिवबा चे धारकरी तुकोबाचे वारकरी”वारकरी संप्रदायाचा आधार म्हणजे शंभुराजे”आम्हाला कोणी सांगितलेच
नाही, आमचा स्वाभिमान आम्हाला
सांगितलाच नाही किंबहुना तो आम्हाला कळूच दिला नाही,महाराष्ट्राचा अभिमान,मराठी
मातीचा स्वाभिमान आम्हाला समजलाच नाही,जगावं कसे हे शिवराय सांगतात तर मराव कसं हे
माझे शंभूराजे शिकवतात, विश्वास घाताने संभाजी महाराज पकडून दिले.आतिशय निर्दयपणे
त्यांचा छळ करण्यात आला, संभाजीराजे समोर असलेल्या कवि कलश ला ऊद्गारले,”कवीजी, कवी आहात आपण, सुचते का एखादी कविता या प्रसंगावर?” आणी कवी कलश आश्चर्याने पाहु लागला, “राजे काय हे? तुम्ही औरंगजेबाच्या समोर आहात,मरनाच्या जबड्यात, मृत्युच्या पोटात आहात, आणी विचारता सुचते का एखादी कविता?,भिती नाही
वाटत?”कविजी ...! आणी कवी,”हो राजे
"यावन
रावन की सभा शंभु बंध्यो बजरंग ।
लहू लसत सिंदूरसम खूब खेल्यो रणरंग ।
रबि छबि लखत खयोत बदरंग ।
लहू लसत सिंदूरसम खूब खेल्यो रणरंग ।
रबि छबि लखत खयोत बदरंग ।
"राजन
तूम हो सांचे..खूब लढे हो जंग!!!..देखं तुम्हारा तेज...तखत त्यजत औरंग!!!
यवनरूपी रावणाच्या दरबारात हे शंभूराजे
तुम्ही बांधलेल्या बजरंगासारखे दिसत आहात जणू लढाई करुन रक्तरुपी शेंदूराने तुम्ही
माखला आहात...!
अहो राजे काय लढलात तुम्ही जंग काय
तुमच तेज काय तुमचं शौर्य राजे तुमच तेज बघून औरंगजेब स्वतः स्वतःचे सिंहासन
त्यागून तुमच्या पुढ येऊन गुढघे टेकून बसलाय...
शंभूराजेंचे
डोळे काढले गेले, जीभ खेचून काढण्यात आली, नखे
ओढून काढली, शरीरावर अमर्याद असे घाव केले .. त्यांचा मृत्यू येई पर्यंत औरंजेब
त्यांच्यावर अत्याचार करतच राहिला, पण
हा सह्याद्रीचा छावा जरा ही डगमगला
नाही .. थोडा ही
बिचकला नाही, आपल्या शेवटच्या श्वास पर्यंत त्यांनी औरंजेबा
पुढे आपली माण झुकवली नाही.संभाजीराजांचा देह औरंगजेबाच्या पाशवी वृत्तीला बळी
पडला, पण त्याच बलिदानातून आणि हौतात्म्यातून मराठी
राज्य बचावले आणि पुढे याच मराठी माती मधे औरंजेबाचा देह गाडला गेला हे मराठी
मनाच्या बांधवांना कधीच विसरता येणार नाही ..!
याच संभाजी राजांचे चारित्र्य हनन करण्याचे काम आमच्याच
काही,बखरकारांनी आणि इतिहासकारांनी,नाटककारांनी,कथा,कादंबरीकारांनी
केले आहे त्याला
कारणीभूत ठरलेली मल्हार रामराव चिटणीसाची बखर ज्या काळात रचली गेली.त्याकाळात मानवी मुल्यांचा ऱ्हास झाला होता,नैतिक
आदर्शांना ओहोटी लागली होती त्या बखरीचा संदर्भ
घेवून माझ्या राजाला बदनाम केले,अलीकडच्या काळात बिडीला संभाजी बिडी म्हणून नाव देवून बदनाम केले,खरा संभाजी कधी लोकांसमोर येऊ दिलाच नाही. पण सूर्याचा
प्रकाश किती काळ लपवून ठेवणार एक दिवस तरी आमच्या तमाम मराठी लोकांच्या डोक्या
मध्ये हा उजेड पडल्याशिवाय राहणार नाही. सूर्या सारख्या तेजस्वी आणि ओजस्वी शिवाजी
राजांचा पुत्र म्हणजे सिंहाचा छावाच. आणि ज्या सईराणींच्या कुशीत जन्माला
येवून जिजाऊ नावाच्या शिवसंस्काराच्या विद्यापीठात वाढलेला शंभू बाळ कसा काय रंगेल ठरवला जाऊ
शकतो.उगवणाऱ्या सूर्याचा प्रकाश जसा घरा घरा पर्यंत पोचतो ..त्याच प्रमाणे माझ्या
याशूर शंभू राजांचा माझ्या सर्जाचा इतिहास आमच्या घरा
घरा पर्यंत पोहचावा असे आवाहन
आपल्याला मी एक शिव-शंभूचा वसा आणि विचारांचा वारसा चालवताना करीत आहे.आजच्या शिवजन्मोत्सवाच्या आपणा
सर्वांस शिवमय शुभेच्छा ...!
जय जिजाऊ ..!जय शिवराय..!! जय शंभूराजे..!!!
जय जिजाऊ ..!जय शिवराय..!! जय शंभूराजे..!!!
(संदर्भ-आरोपीच्या पिंजऱ्यात संभाजी-डॉ अशोक राणा,विकिपीडिया)
शिवश्री संतोष राहीबाई भगवान तळेकर
No comments:
Post a Comment